दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दि.6 सप्टेंबर रोजी दापशेड ता.लोहा येथिल जिल्हा परिषद शाळेत पालक सभा संपन्न झाली झाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी पालक आणि शिक्षक यांचा योग्य समन्वय साधावा म्हणून जिल्हा परिषद शाळा व शालेय व्यवस्थापन समितीने या पालक सभेचे आयोजन केले होते.
या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जोशी सर होते.तर व्यासपीठावर पंचायत समिती लोहा चे विषय तज्ञ अकोले सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी मारोती मोरे हे उपस्थित होते.
ग्रामीण भागात शाळेकडे पालक दुर्लक्ष करत असतात. आपले पाल्य शाळेत जात असते. फक्त हेच त्यांना माहीत असतं. पण त्यांच्या गुणवत्तेसाठी स्वतः पालक म्हणूनही काही गोष्टी करणे गरजेचे असतात त्याकडे मात्र ग्रामीण भागातील पालक दुर्लक्ष करत असतात.. काही ठिकाणी गैरसमजुतीतून आणि योग्य समन्वय नसल्याने शिक्षक आणि पालक यांच्यात विनाकारण विसंवाद दिसून येतो.त्यामुळेच पालक व शिक्षकांमधील ही दरी दूर व्हावी म्हणून दापशेड येथील शालेय व्यवस्थापन समितीने ठरवून ही पालक सभा घेतली.या पालक सभेला पालक उपस्थित होते.. त्यामध्ये महीला पालकांचा पण सहभाग होता. त्यामानाने पालकांची उपस्थिती तशी कमी होती. या पालक सभेत विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या गुणवत्ते संदर्भात पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये योग्य ती चर्चा झाली.शाळेत सतत अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे., विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकामध्ये खेळाचा समावेश करावा. मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग वाढवावा.. आणि दर दोन महिन्याला एक पालक सभा आयोजित करावी.यासह अनेक विषयांवर शिक्षक आणि पालकांची सकारात्मक चर्चा झाली. काही पालकांनी प्रत्यक्ष शिक्षकांना प्रश्न विचारले आणि शिक्षकांनीही त्यांचे समाधान पूर्वक उत्तरे दिली. एकंदरीत चांगला समन्वय या पालक सभेत दिसून आला. पालकांमध्ये शैक्षणिक जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. पालक आणि शिक्षक यांचा योग्य समन्वय असणे खुपच महत्वपूर्ण आहे.
पालक जर आपल्या पाल्या विषयी सजग राहिले.आपले कर्तव्य ओळखून शाळेकडे विशेष लक्ष देऊ लागले.तर नक्कीच ती शाळा व त्या शाळेतील विद्यार्थी सर्वच बाबतीत खुप पुढे गेलेली असेल.. पालकांमध्ये शैक्षणिक जागृती करण्याची ही एक सुरुवात होती. यापुढे शाळेमध्ये दर दोन महिन्याला पालक सभा आयोजित केली जाईल.* व या पालक सभेत विद्यार्थ्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक गोष्टींचे विचार मंथन केले जाईल.आणि यापुढे जास्तीत जास्त पालक या पालक सभेला उपस्थित राहतील असा संकल्प या पालकसभेत सर्वांनी केला..
ग्रामीण भागातील विद्यार्थी खरंच खूप गुणवान आहेत, प्रतिभावान आहेत. फक्त त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे असते. जर त्यांना योग्य दिशा मिळाली तर ते कोणत्याही क्षेत्रात चमकत राहतील.या पालकसभेला पंचायत समिती लोहा विषय तज्ञ अकोले सर उपस्थित होते.त्यांनी पालकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.अकोले सरांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातील दररोज थोडासा वेळ आपल्या पाल्याला आणि शाळेला दिला.आणि प्रत्येक शिक्षकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर नक्कीच ते विद्यार्थी आणि ती शाळा व पर्यायाने ते गाव एका वेगळ्या उंचीवर असेल.असे सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच या पालक सभेत पालक प्रतिनिधी आणि शिक्षक मित्र म्हणून किशन टोनगे यांनीही आपले भुमिका मांडली.त्यामध्ये त्यांनी शिक्षक आणि पालकातील समन्वयाविषयी छान विचार मांडले
प्रत्येक गावात ते सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन आणि आपले गाव व गावातील शाळा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला तर अनेक सकारात्मक बदल आपणास पाहावयास मिळतील..असे ते म्हणाले.तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रतिनिधी मारोती मोरे यांनी आपले मनोगत मांडताना
आपल्याला कोणालाही वेगळे काहीच करायचे नाही. फक्त आपण प्रत्येकांनी म्हणजेच शिक्षक, विद्यार्थी,पालक आणि गावातील सजग नागरिक म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तरी खुप मोठा सकारात्मक बदल आपणास दिसून येतील. अशी अपेक्षा व्यक्त केली.या पालकसभेला गावातील पालकांसोबतच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
या सदरील पालकसभेचे सुत्रसंचलन सहशिक्षक बी.एल.चव्हाण यांनी केले तर आभार गुट्टे सर यांनी मांडले.