दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौजे चेनपूर येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री चंद्रकांत पद्माकर पाटील चैनपूरकर यांनी अतिशय योग्य पद्धतीने निसर्गावर मात करून सोयाबीनचे उत्पादन जास्तीत जास्त कसे काढता येईल यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले व ते प्रयत्न यशस्वी झाले. याची दखल घेऊन जिल्हा कृषी अधीक्षक माननीय श्री चलवदे साहेब, तालुका कृषी अधिकारी गिरी साहेब व त्यांच्या संपूर्ण कृषी विभागाच्या प्रशासनाने श्री चंद्रकांत पाटील चैनपुरकर यांच्या आधुनिक पद्धतीने केलेले सोयाबीनची लागवड व त्यामधून निघणारे उत्पादन यांची पाहणी करून योग्य पद्धतीने नियोजन केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले. व तसेच सबंध परिसरातील व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पद्धतीने लागवड करून उत्पादन वाढवावे तरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल व शेतकऱ्यावर येणारे संकट कमी प्रमाणात होऊन आत्महत्या थांबवल्या जातील असे आवाहन सर्व शेतकऱ्यांना केले. जर शेती कृषी तंत्रज्ञानाच्या वतीने शेतकऱ्यास काही अडचणी आल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा कृषी विभागाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले. चैनपूर येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमानिमित्त चैनपुर गावकऱ्यांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी सर्व आलेल्या अधिकाऱ्यांचे यथोचित मानसन्मान केले. त्याप्रसंगी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते अंतापूर हानमंतराव पाटील अंतापुरकर, दीनानाथ पाटील मंजळेकर,यालावर शहापूरकर,ईरवंतराव तोनसुरे सांगवीकर, हनुमंतराव पिंडकुरे, मारोतीराव हणेगावे, विठ्ठलराव कायतवाड, नामदेव कायतवाड,सुरेश नाव्हेकर, श्याम पाटील, विठ्ठल देशमुख,बोरवाड लक्षुमन,बालाजी माळगे, राजु कोळनुरे,यासारखे असंख्य शेतकरी उपस्थित होते.