दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
समाज म्हणजे काय ? आणि समाजकार्य म्हणजे काय? हा एक चिंतन करण्याचा विषयच आहे..आपण अनेक सामाजिक संस्था संघटना पाहतो गैर शासकीय संघटन म्हणजे NGO पाहतो… या संघटना सातत्याने समाजासाठी काहीना काही कार्ये करत असतात..समाजासाठी झटणे आपत्कालीन काळात मदत पोहचवणे ,शैक्षणिक प्रबोधन करणे, मार्गदर्शन करणे अशा अनेक कार्यातुन संस्था संघटना या सामाजिक कार्य करत असतात तर काही संस्था संघटना या समाजकार्याचा दिखावाही करतांना दिसतात तर काही सामाजिक संघटना राजकीय स्वार्थाने स्वार्थ साधण्यासाठीही समाजकार्य करत असल्याचा दिखावा करतात , कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन जर करायचे असेल तर त्यासाठी प्रत्यक्षात खुप खर्च येतो व मुळ समाजकार्याचे उद्दीष्ट छोटेसे राहते व कार्यक्रमाच्या दिखाव्याचा खर्च जास्तच होतो … याला समाज कार्य म्हणता येणार नाही या भपकेबाजीचा अनाठायी होणारा खर्च टाळला व त्या खर्चासाठी लागणारा पैसा वाचवून प्रत्यक्षात गोरगरीब गरजवंतांना प्रत्यक्षात मदत पोहचविली तर ती खरी निस्वार्थ समाजसेवा ठरते…शुद्ध व निस्वार्थ हेतुने जर आपण एखाद्या गरीब गरजु विद्यार्थ्यांना एक साधा पेन जरी वेळेवर पुरवला किंवा शैक्षणिक मार्गदर्शन केले तर ती ही खरी समाजसेवा ठरते… याच आदर्श मुलतत्वांच्या विचाराने भारावलेले जय आवजीनाथ सेवासंघाच्या संघसेवकांनी एक छोटेखानी छानसा उपक्रम राबवला व या उपक्रमाच्या माध्यमातुन दिनांक ७ सप्टेबर २०२२ रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधुन समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत द्यावी या हेतुने सेवा संघाने औरंगाबाद शहरातील सिडको एन ८ परीसरातील एक प्राथमिक शाळा निवडली होती ..या शाळेचे नाव होतं शुभं करोती प्राथमिक शाळा..या शाळेतील जवळपास सर्वच विद्यार्थी हे अत्यंत गरिब परिस्थितीतील होते.. ज्यांचे पालक त्यांना काहीच शैक्षणिक सुविधा पुरवू शकत नव्हते.. जय आवजीनाथ सेवा संघाच्या वतीने आज या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन क्वायर चे दोन रजिष्ठर नोटबुक सोबत खाउ म्हणून बिस्कीटचा पुडा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यातआला…शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा खैरे/म्हस्केताई यांनी शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले या वेळी जय आवजीनाथ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र करपे यांनी या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले व सर्व मुलांनी खुप अभ्यास करावा व भविष्यात खुप उच्च उच्य पदावर काम करुन देशाच्या विकासाला हातभार लावावा हे सांगीतले.. प्रत्येक विद्यार्थ्यांना रजिस्टर नोटबुक व खाउ मिळताच या मुलांच्या चेहऱ्यारील हास्य व आनंद पाहुन जय आवजीनाथ सेवा संघाच्या समाजकार्यातील सर्वात आनंदाचा समाधानाचा सोहळा ठरला… सेवा संघाचे समन्वयक श्री नरेंद्र सांगळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले…शाळेतील शिक्षक वृंद श्रीमती शोभा प्रदिप खैरे / म्हस्के , श्रीमती प्रमिला फकीरा माळी, श्री रमेश लक्ष्मण बावस्कर , श्रीमती स्वाती दिगंबरराव करपे ,श्री संजय नामदेव मुठे ,श्री रविंद्र मुरलीधर मुळे या सर्वांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खुप परिश्रम घेतले तसेच जय आवजीनाथ सेवा संघाचे पदाधिकारी संघसेवक श्री राजेंद्र करपे संस्थापक अध्यक्ष , श्री मोहन आखाडे प्रसिद्धी प्रमुख ,श्री सांडुमामा खांडरे प्रमुख संघटक,प्रमुख समन्वयक श्री नरेंद्र सांगळे छायाचित्रकार तथा संघसेवक श्री प्रकाश नागापुरकर यांनी सेवासंघाच्या या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले…श्री राजेंद्र करपे श्री कमलेश येलमामे मुंबई , श्री संदिप तारगे वाशी नवी मुंबई , श्री आकाश वराडे व श्रीमती स्मिताताई मुर्तडक तसेच सौ.विजया राजेंद्र करपे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी लागणाऱ्या खर्चासाठी आर्थिक योगदान दिले…. श्री रमेश बावस्कर सरांनी उत्कृष्ट सुत्र संचलन केले व श्रीमती शोभा दिपक खैरे / म्हस्के यांनी जय आवजीनाथ सेवा संघ या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संघसेवकांचे आभार व्यक्त केले.