दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची गेली आठ महिन्याची कारकीर्द पाहता,शहरात सर्वत्र झालेली विविध समस्यांची परिस्थिती ही संपूर्ण भ्रष्टाचारयुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील एका मागून एक समस्या ह्यात सतत वाढ होत आहेत.त्यामुळे प्रशासकांविषयी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.असाच प्रकार नुकताच उघड झाला असून नगरपरिषद अंतर्गत येणारे आठवडी बाजार,रुपलाल महाराज मार्केट विंग-डी मधील सर्व दुकानाचे स्लॅब गळत असल्यामुळे ह्याबाबतची लेखी तक्रार आठ महिन्यांपूर्वी तक्रारकर्ता दुकानदार संतोष गोलाईत ह्यांनी न.प. कार्यालयाकडे केली होती.त्यानुसार योग्य काम करण्यात यावे म्हणून संबंधित कंत्राटदार यांना ते काम देऊन काम करून घेतले.परंतु काम सुरू असतांनाच गोलाईत ह्यांनी चालू काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे मुख्याधिकारी यांना अवगत केले होते.परंतु पुन्हा दुकानात पूर्वीसारखेच पावसाचे पाणी स्लॅब मधून गळत असल्याबाबत पुन्हा संतोष गोलाईत ह्यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोने ह्यांचेकडे तक्रार केली.गेल्या एक महिन्यांपूर्वी पासून तक्रार केली असून मुख्याधिकारी ह्यांनी आश्वासनाशिवाय काहीही केले नाही.त्यामुळे न.प.अंतर्गत येणाऱ्या मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आर्थिक तथा मानसिकदृष्ट्या दुकानदारांना त्रास सोसावा लागत असल्यामुळे ह्याला जबाबदार कोण?हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारदार काय म्हणाले
न.प.मार्केट मधील विंग-डी चे स्लब फ्लोरिंगचे काम ७/८ महिन्याअगोदर झाले.परंतु हे काम होत असतांना काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे तक्रारकर्ता यांनी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी सुमेध अलोने यांना अवगत केले होते.परंतु भ्रष्टाचारी अधिकारी यांनी झालेल्या कामाकडे दुर्लक्ष केले व कंत्राटदार ह्यांचे सोबत संगममत केले.त्यामुळे माझ्या दुकानात पाणी गळत असल्याची पुन्हा तोंडी तक्रार केली परंतु गेंड्याची कातडी ओढलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.असे तक्रारकर्ता दुकानदार संतोष गोलाईत ह्यांनी सांगितले
मुख्याधिकारी यांनी कंत्राटदार आजारी असल्याचे दिले उत्तर
संतोष गोलाईत ह्यांनी मला दोन दिवसांपूर्वीच कल्पना दिली,त्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून,ते काम कंत्राटदार आजारी असल्यामुळे ते आजारातून बरे होता बरोबर करून देतो,असे प्रशासकीय अधिकारी सुमेध अलोने ह्यांनी सांगितले