दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
गारपीर रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सध्या रस्त्यावरील खड्डे तसेच चिखलामुळे निर्माण झालेल्या राडारोड्यामुळे शेतमालाची वाहतूक कशी करावी? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
गारपीर रस्त्यावरील सावंत वस्ती, शिंदे वस्ती व आदी नागरिकांना त्यांच्या वस्तीपर्यंत पोचणेही अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना या रस्त्याने विशेषतः: पावसाळ्यात रस्त्याने आपला शेतीमाल वाहतूक करणे , लहान मुलांना शाळेत जायचं म्हणजे एक प्रकारे सर्कसच करावी लागत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाच्या रिपरिपीमुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी झाली आहेत.
बहूतांश शेतकरी हे शेतात वास्तव्याला आहेत.त्या त्यामुळे त्यांना शेटफळ हवेली व काटी या गावांमध्ये जाण्यासाठी फक्त हा ४०० मीटरच्या आसपास लांबी असणारा हा एकमेव रस्ता असल्याने अशा परिस्थितीमुळे आज त्यांचे या रोड ने जाता-येताना खूप हाल होत असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या रोडची आठवण ही फक्त निवडणुक आली की होते व निवडणूक काळामध्ये या रोडवरती फक्त काही ठराविक ठिकाणी मुरमीकरण करून तेथील लोकांना खोटी आश्वासने देऊन मतदान मिळवले जाते, परंतु निवडणूक झाल्यानंतर पाच वर्ष या रस्त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी फिरकत नाही ना या शेतकऱ्यांना व नागरिकांना किती समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची विचारपूसही करत नाही.
तसेच हा रस्ता शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फार उपयोगी आहे. या भागातील नागरिकांना आपल्या दोन चाकी व चार चाकी गाड्या गारपीर मंदिर येथे उभ्या कराव्या लागतात व तेथून रात्री अपरात्री चालत चिखलातून मार्ग काढत घरी पोचावे लागते. त्यामुळे तातडीने या रस्त्याची ग्रामपंचायत शेटफळ हवेली व राजकीय व्यक्तींनी लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.