दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
खानापूर सर्कल मध्ये गेल्या एक महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाला होता.त्यामुळे शेतीमधील पिके पावसा अभावी करपून जात होती.आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि दुपारी दोन वाजता पाऊस सुरू झाला आणि जवळपास एक तास पाऊस धुवांधार पडला.आज बाप्पाच्या निरोपाची सर्व तयारी करत असतानाच पावसाने जोरदार आगमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला पिकांना जीवनदान मिळाले . आणि बाप्पाला निरोप देताना खंत वाटत असताना पावसाने जोरदार हजेरी लावत शेतक-यांना आनंद देऊन गेला…