दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – भाद्रपद वद्य षष्ठी, 16 सप्टेंबर दिवशी, ‘ज्ञानेश्वरी जयंती’ आहे. वयाच्या 21 व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली असली तरीही अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य आज जगाला प्रेरणा देत आहे.
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ।। स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी ।। तेंचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।। एकाजनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांचे सृष्टिनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते, हेही त्यातून दिसून येते. ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली.
मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगत्कल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त दैनिक चालु वार्तातर्फे मनस्वी शुभेच्छा.