दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : अशोक चव्हाणांनी मोठा गौयस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षांतर्गत चर्चा पक्षाच्या बैठकीत झाली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले कि, आता 2014 साली अशोक चव्हाण यांना शिवसेनेने चर्चा केली असेल, तर मला नक्की तपशील माहिती नाही. पण, अशोक चव्हाण म्हणत असतील, तर त्यात तत्थ्य असेल, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच पुढे पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, भाजप पंकजा मुंडे यांना म्हणावं तसं महत्त्व देत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी कष्ट घेतले. त्यांना काही भागातील लोकं पाठिंबा देत असतात. पण, पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचं काम होतंय. त्यामुळं पंकजा आपलं मत व्यक्त करत असल्याचं दिसतं, असं जयंत पाटील म्हणाले.