दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शारिरीक असो कि मानसिक असो हिंसा घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज भासत नाही .अंहकार, द्वेष, स्वार्थ,मन भेद,आकस, विविध व्यसन,संगत,असे अनेक दुर्गुण आपल्या बुद्धी वर स्वार झाले कि मग हिंसा घडुन येण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.त्यासाठी फार विशेष परिश्रम करण्याची आवश्यकता लागत नाही. पण खरे परिश्रम करावे लागतात.ते म्हणजे अहिंसक होण्यासाठी आणि त्यातही मानसिक हिंसा ज्या मध्ये आपल्या कडुन कोणाचही मन दुखावलं जाणार नाही. किंवा तत्सम तसं आचरण होणार नाही. हि जगातील सगळ्यात मोठी अहिंसा आहे .तरआपल्या कडुन कोणाचंही मन दुखावलं जाण तस वर्तन आचरण होणं हि सृष्टी वरील सगळ्यात मोठी हिंसा आहे . हिंसा म्हणजे फक्त शरिरावर ,जखम ,इजा , जीवतीस धोका निर्माण करणं ,किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान पोहचण म्हणजेच फक्त मर्यादित अर्थाने केलेल कृत्य म्हणजे हिंसा असं आपण ढोबळमानाने समजतो .पण खरया अर्थाने आपल्याला कडुन एखाद्याच मन दुखावलं जाण, किंवा आपल्या मुळे एखाद्याला पश्चात्ताप, मनस्ताप होण, मानसिक कुचंबणा, खच्चीकरण होण, उमेद धेय्य संपुष्टात येण, ताणतणाव येण, ताणव ग्रस्त मनस्थिती होण, वैचारिक गोंधळ निर्माण होण, दबावाखाली वावरण, एकंदरीत शारिरीक व मानसिक स्तरावरील भरून निघणार नाही अशा प्रकारचे नुकसान हि सगळ्यात मोठी हिंसा आहे.कारण शरिरावर झालेल्या जखमा ह्या भरून निघु शकतात .परंतु मनावर झालेली जखम हि जगातील कोणताही औषधाने उपचाराने भरून निघत नाही. म्हणून आपल्या कडून एखाद्याच मन दुखावलं जाण हि सगळ्यात मोठी हिंसा आहे. म्हणून कळत न कळत सुद्धा आपल्या कडून कोणाच मन दुखावलं जाणार नाही. याची काळजी दक्षता घेणं हे सदैव अहिंसक असल्याचं लक्षण आहे.मन , बुद्धी , वृत्ती,व अंतःकरणाने अहिंसक व्हा आपल्या मुळ इतर कोणताही जीव दुःखी होणारं नाही .याची दक्षता घ्या काळजी घेता आली पाहिजे. एखाद्याचे मन दुखावणे हि सगळ्यात मोठी हिंसा आहे हे सदैव लक्षात ठेवून आचरण केले तर आपल्या मध्ये असणारे सगळे सात्विक लोककल्याणकारी गुण नक्कीच प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीत. सृष्टीच सौंदर्य अहिंसेत आहे .सृष्टी वरील कोणत्याही प्रकारच्या जीवाला आपल्या मुळ वेदना दुःख होणार नाही .याची काळजी घेणं खुप गरजेचं आहे. एकमेका सहय करू अवघे धरू सुपंथ सृष्टीच्या रचनेतील सगळे पशु पक्षी प्राणी , वेगवेगळे जीव हे आपलं कर्म बंधन घेऊन आले आहेत . प्रत्येक जण आपापल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपलं जीवन जगत आहे .मग इतरांना त्रास इजा होईल असं आचरण करण कित पत योग्य आहे .जखम करणं किंवा त्या उद्देशाने मारहाण करणं किंवा जीवीतास धोका निर्माण करणयाचा प्रयत्न करणं म्हणजे आपण साधारणतः हिंसा समजत असलो तरी मारहाण किंवा इजा जखम हि भरून निघु शकते .परंतु कधीच भरून निघणार नाही. अशी जखम म्हणजे एखादयच मन दुखावणे. किंवा त्याला वाईट वाटेल असं आचरण करणे .हि सगळ्यात मोठी हिंसा आहे. मानव हा पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान शक्तिशाली बलाढ्य प्राणी आहे.पण आज आपण सृष्टी वरील इतर जीव सृष्टी सह परस्परांना कसं आशांत आणि अस्थिर करता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत.या सगळ्या मध्ये आपण स्वतः ची व इतरांची शांती हिरावतो आहोत .याची जाणीव जागृती सध्या लोकांना राहिली नाही.याचे दुष्परिणाम हे आपल्याला सगळीकडे सध्या दिसत आहे.आणि हि परस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून योग्य वेळी सावध होण्याची आवश्यकता आहे.आणि आपल्या मुळं कोणालाही मानसिक त्रास होणार नाही .याची काळजी दक्षाता सगळ्यांनी घेतली पाहिजे. मानसिक हिंसा हि घातक असुन यावर फक्त ज्ञान हा एकमेव व सगळ्यात प्रभावी उपाय आहे. आपल्याकडे असणार ज्ञान आपल्याला या हिंसेच्या प्रभावातुन आपला बचाव करत म्हणून ज्ञान हा मानसिक हिंसे वरील सर्वतम प्रभावी उपाय आहे. अहिंसा हे सृष्टी चे सौंदर्य आहे आणि आपण त्याच संवर्धन करून संगोपन केले पाहिजे.हि काळाची गरज आहे.आणि त्या मध्ये हि वैचारिक पातळीवर अहिंसक होण महत्वाचे आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मि मार्गदर्शक 9011634301