दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:जिल्हयात विजयादशमीपासून (पाच ऑक्टोंबर) दररोज मध्यम ते हलक्यास्वरूपात पाऊस पडत आहे. दरम्यान, रविवारी गेली. (दि. ९) सायंकाळीही मेघ गर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही तालुक्यात शेतशिवारात पाणी साचून राहिले आहे. सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. तर, काही ठिकाणी कापून ठेवलेले सोयाबीनला मोड फुटत आहेत.
यंदा सुरवातीपासूनच पा- वसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. दरम्यान, जुलै, ऑगस्टमध्येही अतिवृष्टीने पिकांचे आतोनात नुकसान झाले. यातून सावरत थोड फार शिल्लक राहिलेले पिक आता काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने पुन्हा नुकसान केले आहे. अतिपावसामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंडघट होणार आहे, असे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. नदीकाठच्या जमिनीतील पिकांची पूर्वीच नासाडी झाली. उडीद व मूग ही पिके वाया आता सोयाबीन काढणीच्या दिवसात पाऊस सारखा पडत आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, सिरंजनी, सरसम, सवना, बोरगडी,
धानोरा, घारापुर, डोल्हारी, कामारी, पोटा, मंगरूळ, वॉरंगटाकळी, सिरपल्लीसह अनेक गावा तील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. तसेच किनवट तालुक्यातील शिवणी, जलधारा या मंडळात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. माहूर, भोकर, अर्धापूर इतर तालुक्यातील पिकांचीही परिस्थिती सारखीच आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.