दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे नागार्जुना औषधी वनस्पती फॉमर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने तहसीलदार मा.श्री.अभिजितजी जगताप यांना निवेदन देण्यात आले.संत्रा,केळी फळ बागायत सोबतच सर्वेक्षणात पिंपळी पिकाचा सुद्धा सामावेश करावा.नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे माजी नगराध्यक्ष ऍड.कमलकांत लाडोळे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे हे नागार्जुना औषधी वनस्पती फॉमर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई सर्वेक्षणात पिंपळी पिकाचा समावेश करण्यात यावा यासाठी विशेष भर दिला.कारण संत्रा,केळी फलबागायत सोबतच पिंपळी या अतिमहत्त्वाच्या बागायती पिकाची लागवड अंजमगाव सुर्जी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होते.विविध औषधीमध्ये व मसाल्यामध्ये या पिकाचा वापर असून याची लागवड वातावरण बदलातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेली आहे.तरीपण या नुकसानीचे सर्वेक्षण करुन बाधीत शेतकऱ्यास आर्थिक नुकसान भरपाई लवकरात-लवकर मिळण्यात यावी यासाठी तहसीलदार अभिजितजी जगताप निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देतेवेळी मोठया संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.