दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- सदरील माहिती असी की बोगस कागदपत्रे दाखवून व बनवून सन 2022 -23 मध्ये शासनाच्या आर .टी. ई अंतर्गत केलेला मुलांचा प्रवेश रद्द करून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी मौजे जवळगा ता. अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा. बालाजी कदम सर यांनी तहसील कार्यालय अहमदपूर, पंचायत समिती अहमदपूर आणि एस.डी.ओ यांच्याकडे निवेदनाद्वारे माहिती दिली आहे तसेच किलबिल नॅशनल स्कूल अहमदपूर मौ. जवळगा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आर. टी.ई अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना व शाळेच्या नजीकच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो परंतु मोहन कासले आणि विवेक शिंगडे हे मौजे
अंधोरी येथील रहिवासी असून त्यांनी मौ. जवळगा येथील रहिवासी नसताना देखील व ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल नसताना सुद्धा तहसील कार्यालय अहमदपूर येथून बनावट कागदपत्रे आधारे रहिवासी प्रमाणपत्र व कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हस्तगत करून त्यांच्या पाल्यांचा किलबिल नॅशनल स्कूल अहमदपूर येथे सन 2022- 23 मध्ये प्रवेश घेतला आहे ज्यामुळे मूळ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत सदर बाबीची सखोल चौकशी केली असता आपणास अनेक विद्यार्थी याच प्रकारातून प्रवेशीत झाल्याचे निष्पन्न होणार आहे तसेच सदरचे खोट्या कागदपत्रे आधारे सदर योजनेचा लाभ कसा घेतला येईल व ती प्रक्रिया कशी तुम्हास मिळवता येईल याचे मार्गदर्शन हे ज्या त्या शाळेने नेमलेल्याचअधिकाऱ्याकडूनच मिळालेले आहे म्हणून या मध्ये कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी देखील तितकेच दोषी आहेत मी जवळगा येथील रहिवासी असल्यामुळे मला माझ्या गावातील कोण रहिवासी आहेत आणि कोण नाहीत याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे माझ्या एका गावचे चुकीचे कागदपत्रे बनवून तीन प्रवेश केले आहेत तरी अहमदपूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळेच्या भोवती असणाऱ्या अनेक गावाचे चुकीचे स्थान दर्शन किती प्रयोग झाले असतील याची कल्पनाच करता येत नाही तरी मा. साहेबांनी विनंती आहे की माझी की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पालकावर पडताळणी अधिकारी यांच्याबरोबर संबंधित शाळेच्या प्रश्नावर योग्य ती कारवाई करून लाभार्थ्यासाठी लाभापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रेक्षित करून घेण्यात यावे व बनावट कागदपत्रे आधारे घेण्यात आलेले प्रवेश रद्द करून योग्य तो दंड योग्य ती दंड देऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी कदम जवळगेकर यांनी केले आहे