दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कौठा:- ता.कंधार
सोयाबीन गंजीला अद्यात व्यक्तीने आग लावून नुकसान केलेल्या व पुराच्या पाण्यात गाय वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांना ग्राम पंचायत सदस्या महादेवी भुजंग देशमुख व भुजंग देशमुख यांच्या वतिने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत धान्याची किट वाटप करण्यात आले
कंधार तालुक्यातील कौठा येथील गुणवंत महाजन पालिमकर व मन्मंथ चंदर श्रीकंटवाड ह्या दोन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना युवक काँग्रेसचे भुजंग देशमुख यांच्या वतिने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासना कडून कुठलीच मदत मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होते हिच बाब ओळखुन त्यांनी दोन कुटूंबातील शेतकर्याची दिवाळी अल्प का होईना मदत करुण एक नविन पायंडा पाडला आहे. सदरिल कुटुंबास जिवन आवश्यक वस्तू देण्यात आले यावेळी शेतकर्यीच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते यावेळी भुजंग देशमुख बालाजी कंधारे दिनकर तंवडे विठ्ठल पालिमकर बालाजी पन्नासे मन्मंथ पालिमकर खंडू पालिमकर शंकर स्वामी आदि उपस्थित होते.