दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
संस्कार भारती नांदेड आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत बालाजी पेटेकर खतगावकर प्रथम,प्रा.पल्लवी कोहिरकर द्वितीय तर सिध्दिका कराळे तृतिय क्रमांकाने यश संपादन करून आपल्या कलात्मकतेचा ठसा उमटवला.नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. बालाजी पेटेकर हे श्री शिवशंकर विद्यालय वन्नाळी ता.देगलूर येथे कलाध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी यापूर्वी दुर्गा महोत्सव नायगाव आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता.तर साने गुरुजी विद्यालय अर्धापूर येथील रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत अनेक स्पर्धेत यश संपादन केले.बालाजी पेटेकर हे चित्रकले बरोबरच एक उत्कृष्ट कवी,कथाकार गायन,शिल्पकला,मूर्तीकला,पिंपळावरील पानांची चित्र आणि साबणावरील शिल्पकला अशा बहुआयामी कला व्यक्तिमत्वाने जिल्ह्यातील रांगोळी स्पर्धेत आपल्या यशाची घौडदोड कायम ठेवत ही स्पर्धा जिंकली.या रांगोळी स्पर्धेत जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 73 स्पर्धकांनी भाग घेतला होता.या कार्यक्रमास जेष्ठ विचारवंत राम जाधव,जेष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी सर,मनोज बोरगांवकर यांच्यासह साहित्य व कलाक्षेत्रातील मान्यवराची उपस्थिती होती.त्यांच्या या यशाबद्दल सर्व मित्र परिवारातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. मा.दि.मा.देशमुख,जयंत वाकुडकर,सौ.अंजली देशमुख,प्रमोद देशपांडे,सौ अंजली कुलकर्णी,श्री दीपक बिडकर,राजू आंबेकर,सुरकुटवार सर यांच्या सुंदर नियोजनबद् संकल्पनेतून हा कलासाधकांचा कार्यक्रम यशस्वी झाला.