दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कपट कारस्थान षडयंत्र हा मार्ग सुसाट गतीमान व अल्पावधीतच प्रचंड उंचीवर पोहचवणारा नक्कीच आहे या बाबतीत अजिबात दुमत नाही.या मार्गाने मार्गक्रमण करत आपण इच्छीत वांछीत स्थळी नक्कीच पोहोचु शकतो .पण पोहचल्यावर ती उंची ते ठिकाण किती काळ अबाधीत राहिल हे मात्र निश्चित नसतं .याच मुळं पाया हा अनितीवर उभा असतो.आणि अनितीचा पाया हा मजबूत भासतो वास्तविक मजबूत नसतो.महणुन कपट कारस्थान षडयंत्र या तंत्राचा वापर आपल्याला जीवनात करून काही क्षणिक लाभ आपल्याला मिळेलही पण हा लाभ फार काळ टिकणार हा नाही नैसर्गिक न्याय आणि सिद्धांत आहे. कारण नैसर्गिक शक्ती हि कधीच असत्याची ,अधर्माची साथ देत नाही म्हणून सत्याच्या बाजूने निसर्ग हा नेहमीच सकारात्मक असतो . म्हणून अंतिमतः सत्याचा विजय हा निश्चित असतो .चांगले कर्म केले पाहिजे हि प्रत्येक धर्मातील मुख्य शिकवणं आहे आणि सामाजिक संस्कार सुद्धा हेच मार्गदर्शन करताता याच अनुकरण कारण हे उत्तम पण याच अनुकरण लोक आप आपल्या सोयीनुसार ज्ञाना नुसार करतात व तसेच परिणाम मिळवतात .पण चांगल्या कर्माचे फलित चांगले फळ असते . हे सर्वांना माहित आहे जगजाहीर आहे.तरी सुद्ध अनेक क्षेत्रांत अनेक लोकांचा काल हा सध्या या मार्गावर न आचरण करता तात्काळ पुढे वेगाने जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने षडयंत्र कपट कारस्थान करून अल्पावधीतच फार प्रचंड गतीने पुढे जाण्या मध्ये काल आहे .पण हे सगळं स्वतःसाठी घातक असतं .पुढे जाण्याचा वेग जितका अफाट ,सुसाट तितकाच परतीचा वेग अफाट म्हणून पुढे जाण्याचा मार्ग जर सत्याचा , धर्माचा न्यायचा,नितीचा ,शांत संयमी स्थिर असेल तर मग मात्र परत योण्याचा प्रश्न उद्भवत नाही . म्हणून पुढे जाण्याचा मार्ग आणि वेग हा सत्याचा असला पाहिजे .सत्याचा वेग भललेही मंद असेल पण खात्रीशीर आहे.कपट कारस्थान षडयंत्र या मार्ग वर खूप गतीने पुढे जाता येत पण परत येण्याचा मार्ग हा तसाचा आहे. या पद्धतीने मिळणार फळ हे क्षणिक आहे. कारण सत्याचा विजय अंतिमतः निश्चित असतो . सत्य हे परेशान नक्कीच होऊ शकत या मध्ये काहीच दुमत नाही सत्य पराजीत होत नाही म्हणून शेवटी सत्याचा विजय हा निश्र्चित असतो . कपट , कारस्थान, षडयंत्र ,हे सृष्टी वर नवीन नाही ,युग कोणतही असलं तरी कपट, कारस्थान, षडयंत्र हे अनाधी काळापासून चालत आलेलेले अवगुण आहेत किंवा दुष्ट विघातक शक्ती आहेत. त्याचा वापर करून अनेकांनी क्षणिक संधी साधल्या असतीलही पण फार काळासाठी नक्कीच नाही.कारण कपट कारस्थान षडयंत्र हे क्षणिक बलशाली असतात भासतात पण शेवटी सत्यमेव जयते असतेच म्हणजे संयमाला सत्याला निश्चित फळ आहे .म्हणजे कपट कारस्थान षडयंत्र या मध्ये बळ आहे पण अंतिमतः संयमाला फळ आहे हे निश्चित . सध्या जे विद्यमान युग चालू आहे ते परंपरेनुसार धर्मानुसार कालयुग चालू आहे.आणि कालयुग हे चंचल गतिमान युग आहे .या युगात जीवन व्यतित करणारा मणुष्य प्राणी सगळ्यात जास्त बुद्धीवान चुतुर आहे. अल्पकालीन सुख सोयी, सुविधा संपदा जमविण्यासाठी कालयुगातील मानव भौतिक संसाधन या मध्ये एवढा तलिन आहे की सत्य आणि असत्य काय याचा विसर पडला आहे .वेळ काळ ,माय बनुन उभा आहे,माणसुकी वार्यावर आहे . सत्य सात्विकता कोसो दूर आहे. असत्य खुप प्रभावी भासत आहे. कपट कारस्थान षडयंत्र हे तात्काल विजयी आहे असंच काहीसं चित्र सध्या सगळीकडे सगळ्याच क्षेत्रात प्रकर्षाने जाणवते आहे.आणि याचा परिणाम असा होत आहे कि हे पाहून अनेकजण प्रभावित होत आहेत हि शोकांतिका आहे . परंतु वास्तविक सत्य हेच आहे हे सगळं क्षणिक आहे . आणि याची जाणीव सध्या आपल्या आजूबाजूला दिसत नाही लोकांच्या मतानुसार क्षणिक हे खुप प्रभावी भासत असल्याने सगळ्यांची ओढ तिकडेच जातोय पण हे आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी घातक आहे कारण संयमाला फळ आहे .आणि संयमाच फळ हे शाश्वत आणि दिर्घ कलिन आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301