दैनिक चालु वार्ता वृतसेवा-
मुंबई 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या. त्यातील अत्यंत महत्वाची घटना म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 रोजी राजभवनात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा अनुक्रमे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री पदासाठी झालेला शपथविधी.
शपथविधीनंतर राजकीय वर्तुळात, पवार कुटुंबात फूट पडल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. नुकतंच या शपथविधीबाबत करूणा मुंडें यांनी मोठा खुलासा केला आहे.
करूणा मुंडे म्हणाल्या आहेत की, धनंजय मुंडे 2019 ला सकाळी सात वाजता 40 आमदार घेऊन भाजपकडे गेला होता. त्यावेळी एका दिवसाचं सरकार बनवलं आणि स्वत: लपले होते. या सगळ्या मागचं षडयंत्र मला माहित आहे, हे सगळं धनंजय मुंडेंनी केलं होतं. हे तुम्ही केलं तर चमत्कार आणि दुसऱ्यानं केलं तर बलात्कार .
आताच्या घडीला भाजप पक्षाला कोणाल घेऊन तोडायची किंवा जोडायची गरज नाही. आमचे मोदीची खूप पावरफुल आहेत, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
तसेच धनंजय मुंडे 40 आमदार घेऊन गेले तरीही शरद पवारांनी त्याला माफ केलं. हॅट्स ऑफ आहे शरद पवारांना असंही करूणा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, माझ्यापाठी मागे जे जे षडयंत्र चालू आहे, ते मी लवकरच मोठी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांसमोर आणणार आहे, असा इशाराही त्यांनी धनंजय मुंडेंना दिला आहे.