दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
मुंबई. कोरोनांच्या काळापासून आयपीएस दर्जेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. यामध्ये दिवाळी अगोदरच शिंदे-फडणवीस सरकारने राज्यांतील जवळपास ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण या बदलांमध्ये गेले दोन दिवसापासून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी जिल्ह्यांमध्ये तीन एसपी सध्या कार्यरत आहेत. परंतु पुढील आदेश येईपर्यंत तेथील पोलीस अधीक्षकांना कारभार पाहण्यांचा आदेश देण्यात आला आहे. आयपीएस बदल्यांमध्ये काही अधिकार्यांना बदली आदेशांत नाव असून त्या जिल्ह्यांत नियुक्ती नाही. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक ते एसपी प्रमोशनवर असलेले अधिकारी यांना आता अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर सीनियर एसपींना पदभार घेण्यांचे आदेश पोलीस महासंचालकांकडूंन प्राप्त झाले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना पदभार घेण्यापासून रोखण्यांत आले आहे. आणि त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्यांचे सध्या सर्वत्र दिसून येत आहे. गौरव सिंग हे यवतमाळचे पोलीस अधीक्षक होते. त्यांना या पदावून हटवण्यात आले त्या ठिकाणी जी.श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली. पवन बनसोड यांना चंद्रपूर पोलीस अधीक्षक पदावरून हटवण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. रवींद्र परदेशी यांना पदभार घेण्याच्या आदेश जारी करण्यात आले. तर डॉ. रवींद्र परदेशी यांची सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात यांच्या नावाची चर्चा चांगलीच आहे.परंतु पोलीस अधीक्षक हे अंकित गोयल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील. सोमवारी अंकित गोयल पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात हजर होणार आहेत. यांच्यासह काही जिल्ह्यांमध्ये एका दिवसात पोलीस अधीक्षक बदलले त्यामुळे सध्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शिंदे-फडवणीस सरकारकडून चांगलाच गोंधळ झाल्यांचे पाहायला मिळत आहे. तरीसुद्धा अजूनही काही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक बदलण्यांची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदभार घेण्यांचे आदेश दिले का असा आता सवाल आता चागलाच उपस्थित होत आहे? तसेच त्या त्या जिल्ह्यांतील नियुक्ती न मिळालेल्या पोलीस अधीक्षकांना तेथीलच कारभार पाहण्याचा आदेशही यावेळी जारी करण्यात आला आहे.