दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगांव शाखा कोल्हापूर आयोजित अ.भा.दुसरे शिव मराठी साहित्य संमेलन छ.शिवाजी महाराज साहित्य नगरी, संजीवनी नॉलेज सिटी सोमवार पेठ पन्हाळा. जि.कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सकाळी ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात झाली.
उद्घाटन सत्रात डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व अध्यक्ष प्रभास भारत सरकार यांनी दिली येथून फोनवर आपला अभिप्राय दिला .गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्रीप रमाकांत खलप यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन करणेत आले. प्रास्ताविक श्री. डॉ. शिवचरण उज्जैनकर (शिवा सर) सं. अध्यक्ष, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगांव यांनी आपले फाउंडेशनचे कार्य आपले मनोगतात मांडले. तसेच प्रा. एन. आर. भोसले सहसचिव संजीवनी नॉलेज सिटी पन्हाळा यांनी स्वागताध्यक्ष भाषणात सर्व मान्यवरांचे स्वागत करून संमेलनाचे महत्त्व सांगितले. यावेळेस उपस्थित पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास रमाकांतजी खलप गोवा, पद्मश्री निलीमाताई मिश्रा, डाॅ. संतोषकुमार बजाज, श्री. गणेश मरकड उपजिल्हाधिकारी सांगली हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध ग्रामीण कथा, कांदबरी लेखक दि. बा. पाटील यांनी भूषवले. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात जात, पात, वर्ण व्यवस्था, व्यवहार, जुन्या, नव्या चालीरीती, ग्रामीण जीवनातील, खेड्यापाड्यातील जगण्यासाठी चाललेली माणसांची धडपड, यांचे अनेक दाखले देत ग्रामीण भागात मराठी साहित्य संमेलन भरवली पाहिजेत असे सांगितले.
त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचारवंताचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे विविध पुरस्कार देऊन सन्मान करणेत आले. यामध्ये ह. भ. प. संजय महाराज धोंडगे. कारजा, नाशिक, तापी पुर्णा जीवनगौरव पुरस्कार अॅड. रमाकांतजी खलप माजी उपमुख्यमंत्री, गोवा. कॅप्टन गणपतराव घोडके महाडीक कोल्हापूर. डाॅ. राजश्री पाटील. खिद्रापूर शिरोळ. तसेच उत्कृष्ट समाजसेवा डाॅ.सुनिल बेळगावे सांगली. डाॅ.महेश ढगे पाटील अंबरनाथ ठाणे. प्रा. डाॅ. भारती पाटील तासगांव सांगली. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार बी.जी.वाघ. धनाजी घोरपडे, कमलेश गोसावी, डाॅ.स्मिता पाटील, बबनराव शिंदे, दत्ता मोरसे, डाॅ.दिपक सूर्यंवंशी, प्रा.शिवाजी बागल, यांना मान्यवरांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डाॅ. सतीश तराळ, डाॅ.प्रतिमा इंगोले, प्रा. सौ. लिला शिंदै, एस. डी. भिरूड, लहूजी शेवाळे, रमेश वसकर, अजित रणदिवे, डि. बी. जगत्पुरीया, प्रकाश तळवडेकर, लेखक श्रीकांत पाटील सर, अॅड.अजितसिंह राणे, तुळशीराम बोबडे, सरदार पाटील, बाबा कदम, किरण झरकर, एच. वाय. शिंदे , बबन बोबडे उपस्थित होते.
या सत्राचे सुत्रसंचलन संदिप व्हनाळे, डाॅ. राजकुमार कांकरिया, यांनी केले.
दुपारच्या सत्रात डॉ. सतीश तराळ अमरावती यांचे अध्यक्षते खाली कथाकथन फार पडले.यात प्रा.मंदा नांदूरकर तानाजी आसबे क.वाळवे, अशोक कोकाटे कोल्हापूर यांनी आपल्या विनोदी कथा कथन करून रसिकांना हसवून स़मेलनात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.विद्या खामकर गारगोटी,सौ.संयोगीता महाजन.कोल्हापूर यांनी केले.तसेच प्रसिद्घ लेखक डॉ.श्रीकांत पाटील, कोल्हापूर यांची प्रखट मुलाखत चंद्रकांत निकाडे, लेखक,मनोहर भोसले यांनी घेतली.यांचे सुत्रसंचलन सौ.नसिम जमादार, महेद्र कुलकर्णी कोल्हापूर यांनी केले.
हे संमेलन यशस्वी करणेसाठी डाॅ .शिवचरण उज्जैनकर व त्यांचे सर्व सहकारी तसेच कोल्हापूर शाखा पदधिकारी श्रीकांत पाटील, परशराम आंबी ,मा.ग .गुरव. प्रकाश पाटील. अजय वंगे,एम.डी.रावण, मनोहर भोसले, कवि सरकार इंगळी,रविद्र आपटे,बाबा कदम, सचिन चौगुले,कु.पंकज शिर्के,सौ,संयोगीता महाजन, सौ,नसिम जमादार,प्रणिता तेली,उर्मिला तेली, तानाजी पाटील,संभाजी चौगुले संदीप व्हनाळे,चंद्रकांत निकाडे,आर. डी. महापूरे, सौ,पुष्पावती दरेकर यानी परिश्रम घेतले.