दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना पदोपदी पावलोपावली आपल्याला योग्य मार्गावर ठेवण्याचं काम सतत ज्ञान बुद्धी करत असते . परंतु याच दरम्यान जीवनात अनेक भावनिक घडामोडी घडत असतात आणि याच प्रत्यक्ष अ प्रत्यक्ष परिणाम आपल्या जीवनावर होत असतोच . भावनिक घटना घडामोडी ह्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विषयांशी निगडित संबंधित असतात आणि वेळेनुसार या भावनिक घटनांचा गांभिर्य हे सुद्धा वेगळं असत आणि याच दरम्यान या घटनांचा घडामोडी चा आपल्या बुद्धीवर प्रभाव निर्माण होऊन जीवनात प्रचंड वादळं निर्माण होऊ देयची नसतील तर भावनिक चक्रव्युहातुन बाहेर पडण्यासाठी आपली ज्ञानबुद्धी सदैव सकारात्मक ज्ञानावर स्थिर जागृत असली पाहिजे.भावनिकतेला फार कुरवाळत न बसता वास्तविक सत्य जाणून घेऊन पुढे मार्गक्रमण करण गरजेच असत . जीवनाच्या प्रवासात आपण नेहमी वारंवार भरकटलो जातो ते म्हणजे भावनिकतेमुळे खर पाहिलं तर आपली बुद्धी हि सत्याची पारखी असते .पण कधी पर्यंत जोपर्यंत आपण ज्ञानावर असतो .तो पर्यंतच एकदा का आपलं ज्ञान विचलित झाल किंवा आपण ज्ञान मार्गावरून बाजूला झालो कि मग मात्र भवनिकता हि बुद्धी वर अरूढ होते .व जीवन अस्थिर होते आणि याच दरम्यान मग आपलं कहि खरं राहत नाही. म्हणजे आपलं आपल्यावर पुर्ण नियंत्रण राहत नाही .याच दरम्यान चर्या काळात आपण कधी फसलो गेलो हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. मग समुळ सगळं वाटोळं झाल्यानंतर लक्षात येऊन तरी उपयोग काय आणि महणुन आपण सदैव सजग राहून आपण भावनिकतेचे शिकार होणार नाहीत. याची दक्षता आपणच घेतली पाहिजे.यासाठी आपली योग्य समज ज्ञान कामी येत . सत्य समोर असताना ते न दिसण . किंवा सत्य पाहण्याची भावना न होणं . किंवा खोट्या माया जलात एवढं खोलवर पोहचण कि सत्य दुर दुर पर्यंत न दिसण . वास्तविक भवनिकता म्हणजे सत्यापासून दुर जाण आणि जेव्हा आपण सत्यापासून दुर जातो तेव्हा आपण शक्यतो भरकटतो . आपल ज्ञान कमी पडल कि आपण भावनिक नदीच्या पुरात वाहून जातो . आपल्याला भावनिकते च्या पुरातुन आपला बचाव करायचा असेल तर आपलं ज्ञान हे प्रभावी असलं पाहिजे.महणजेच आपलं ज्ञान बुद्धी आपल्याला भावनिक चक्रव्युहातुन बाहेर पडण्यासाठी प्रभावी ठरू शकते. सत्या पासून आपल्याला दुर घेउन जाणारया सगळ्या बाबी विषय म्हणजे भावनिकता . आपला मुख्य घोळ इथंच होतो आपण नेमकं मोठं कोणाला समजतो . आणि ज्या पद्धतीने मोठं समजतो त्याच पद्धतीने आपण आपल्याला कोणी मोठेपणा दिला कि भावनिक होऊन शिकार होतो . शेवटी परिणाम आल्यावर पश्चात्ताप करतो .हे निसर्ग चक्र आहे.वेळीच सावध व्हा भावनिक ते ऐवजी बुद्धी वापरा आणि आपली रक्षण करा सध्या भावनिकत हे सगळ्यात उत्कृष्ट भांडवल आहे.कोणीही उठतो भवनिकतेची गुंतवणुक करतो . स्वतः चा भरपूर लाभ करून घेतो . आणि त्याचा लाभ झाला कि मग हळूहळू तो भावनिक मुद्दा बाजुला जाऊन दूसरा भावनिक मुद्दा समोर येतो .हा खेळ निरंतर चालू राहतो .मग जो या भावनिक खेळात फसला आहे तो बाजुला होतो . आणि तो पश्चात्ताप करतो . तोपर्यंत दुसरा लाभार्थी तयार होतो .हा खेळ चालू राहतो.पण पश्चात्ताप करून काही उपयोग आहे का तर नक्कीच नाही मग आपण या खेळात अडकाल नाही पाहिजे . भावनिक दुकान दिसली कि आपली ज्ञान बुद्धी चा वापर करून कशासाठी काय चाललंय हे अगोदर समजलं पाहिजे.महणजे एखाद्या विषयावर जर कोणी आपल्याला भावनिक करत असेल तर आपल्याला आपली बुद्धी वापरून यामागे असणारा हेतु समजला पाहिजे.तयाची वास्तविकता समजली पाहिजे . त्यामध्ये दडलेला स्वार्थ समजलं पाहिजे .हे सगळं अगोदर समजलं पाहिजे.पण असं होतं नाही आपल्या कोणी गोड बोललं मोठेपणा दिला कि आपण बुद्धी वापरत नाही भावनिक होतो . आणि मग शिकारी आपली शिकार बरोबर करतो .याला जबाबदार आपणच असतो. आपण स्वतः आपली या चक्रव्यूहातुन सोडवणुक करून घेऊ शकतो.तयासाठी आपण भावनिक न होता आपलं ज्ञान वापरलं पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301