दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मण्याड नदीवरील पूलाच्या दुरुस्तीस अखेर सुरुवात…
कंधार तालूक्यातील बहादरपुरा मन्याड नदीवरील पुलाकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नव्हते . पूलावर मोठे-मोठे खड्डे पडून वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत पुलावरून वाहने पार करावे लागत होते. त्यासाठी भविष्यात होणारा मोठा धोका होणार होता.धोका टाळण्याची गरज असल्याचे वाहन चालकासह प्रवासी व पादचाऱ्यांकडून मागणी होत होती की पुलाची दुरुस्ती करावी . याची दैनिक चालु वार्ता न्युज पेपर व न्युज लाइव्ह ने वारंवार दखल घेतली व बातमी लावली त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली असून बहादरपुरा येथील मन्याड नदीवरील पूलाच्या कामास आज सुरुवात झाली.
जवळपास ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या सदरच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते.काही संरक्षण पाईप तुटले होते. सध्या मानार प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या बॅक वॉटरमुळे पाणी पातळी पुलाबरोबर झाली आहे, तर पुलावरील स्ट्रेटलाईटचे पथदिवे पूर्णतः बंद पडले आहेत.
त्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावरून जाताना समोरून मोठे वाहन येत असल्यास दुचाकी स्वतःलाच समोरचे काहीच दिसत नाही,
त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुलावर पडलेले खट्टे तुटलेले संरक्षण पाईप बंद झालेले पथदिवे, पुलाच्या दोन्ही बाजूने मन्याड नदी काटोकाठ तुडुंब भरलेले पाणी या सर्व गोष्टीचा विचार करता हा पूल धोक्याचा इशारा देत होता तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत होते व प्रवाशांचा जीव धोक्यात येत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम म्हणजे आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात यासारखे होते त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पूलाचे काम तात्काळ करावे अशी बातमी लागताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पुलास सुरुवात केली त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सा.बां. विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा प्रवाशात होत होती. या विषयाचे वृत्त दैनिक चालु वार्ता ने प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून सदरील पुलावरील कामास सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.