दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडचे बॉलर्स सार्थ ठरवणार अशी चिन्हं होती पण विराट कोहली आणि त्यानंतर हार्दिक पंड्या यांनी दिमाखदार खेळी करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
भारतीय संघाने दिलेलं 169रन्सचं आव्हान बटलर-हेल्स जोडीच्या फटकेबाजीसमोर एकदमच फिकं ठरलं. अंतिम लढतीत रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम मुकाबला होणार आहे.
संपूर्ण इनिंग्जदरम्यान हेल्स-बटलर जोडीने आक्रमणाची तीव्रता वाढवत नेली. भारतीय संघाची बॉलिंग आणि फिल्डिंग दोन्हीमध्ये ढिसाळपणा झाला. बटलरने 49 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्ससह 80 रन्सची खेळी केली. हेल्सने 47 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्ससह 86 रन्सची वादळी खेळी केली.
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडच्या संघाने भारतावर मोठा विजय मिळवला. दहा गडी राहून इंग्लंडच्या संघाने अंतिम फेरीमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला.
भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली
इंग्लंडविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी पुन्हा एकदा निराशा केली. केएल राहुल ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला, तर रोहित शर्माने 28 चेंडूत २७ धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांचा स्ट्राईक रेट १०० किंवा त्याहून कमी होता. टी२० क्रिकेटमध्ये जर एखाद्या संघाला मोठ्या लक्ष्याचा पाया घालायचा असेल तर सलामीवीरांना पहिल्या ६ षटकांचा फायदा घ्यावा लागतो, त्या दरम्यान ३० यार्डच्या बाहेर फक्त २ क्षेत्ररक्षक असतात, पण भारताला फायदा घेता आला नाही. भारताने पहिल्या ६ षटकात केवळ ३८ धावा केल्या होत्या, तर दुसरीकडे इंग्लंडबद्दल बोलायचे तर त्यांनी पॉवरप्लेचा फायदा घेत ६३ धावा जोडल्या.
सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजा कडून निराशा –
सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी उपांत्य फेरीत निराशा केली. पॉवरप्लेमध्ये दोघांना ना विकेट घेता आल्या ना धावा रोखता आल्या. शमी, अश्विन आणि पांड्या यांनीही प्रत्येक षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या.
टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या सर्वात लाजिरवाण्या पराभवांपैकी हा एक असल्याची चर्चा सोशल मीडियावरही सुरु झाली आहे