दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पाल्याच्या भविष्या संदर्भात पालक चिंतित असणं स्वाभाविक असतं . मुलांनी खुप अभ्यास करावा खुप मोठं व्हावं , उच्च शिक्षित होऊन सुसंस्कारित व्हावं हि प्रत्येक पालकाची ,आई वडील यांची मनोमन इच्छा असते . आपल्या वाट्याला आलेला संघर्ष दुःख वेदना, अठरा विश्व दरिद्रय किमान मुलांच्या नशिबी तरी येऊ नये म्हणून प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना घडविण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो.हि धडपड एकतर्फी ठरू नये हि पालकांची चिंता असते .पण मुलांना याच फार गांभीर्या नाही हे वास्तव आहे .याच दरम्यान पालक आणि मुलं यांच्या मध्ये कटुता निर्माण होते .त्याचा परिणाम कुटुबासह मुलांच्या अभ्यासावर देखील होतो . म्हणून मुलाच्या भवितव्यासाठी चिंतित पालकांनी मधला मार्ग काढत आपल्या पाल्या सोबत मैत्री पुर्ण मार्गदर्शन करावं .मुलांचा पालक मालक या भुमिकेतुन बाहेर येऊन मित्राच्या भुमिकेत मार्गदर्शन केले म्हणजे ते मुलांना पण रूचेल आणि पचेल . ज्या पद्धतीच जसं युग असतं. तशी पिढी आचरण करत असते . त्या त्या युगाचा त्या त्या पिढीवर वैचारिक परिणाम जाणवत असतोच . सध्या तर चंचल अस कलयुग चालू आहे.आणि सोबत तंत्रज्ञान युगाचा प्रभाव आणि संस्कारांचा अभाव सगळीकडे प्रामुख्याने जाणवतं आहे . मुलांना घडविण्यासाठी त्यांना दडपणाखाली ठेवण्या ऐवजी मित्र म्हणुन समजावणं जास्त हितकारक ठरते. मुलांच्या भविष्याविषयी प्रत्येक पालक चिंतेत असतोच .आपली मुल हि आपल्या अज्ञेत राहवीत शब्दात राहावीत अशी मनोमन इच्छा प्रत्येक पालकांची आई वडील यांची असते . याच प्रमाणिक भावनेतून आपली मुल घडली पाहिजेत . याच इच्छे पोटी प्रत्येक आई वडील पालक हे आपल्या पाल्यांनवर वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात .पण हे नियंत्रण सध्याच्या मुलांसाठी जड जातंय . त्यांना नियंत्रण बंधनं नको असुन मुक्त संचार हवा आहे. नियंत्रण प्रस्थापित करण्याची आई वडील पालकांची भुमिका अगदी रास्त असते योग्य असते .पण मुलांना या विषयी फार गांभीर्य नसते हि शोकांतिका आहे. आपल्या मुलांच हित व्हाव एवढीच त्यांची प्रमाणिक इच्छा असते .याच सरळ साध्या आणि प्रमाणिक भावनेतून आपले पालक आपल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दडपणाचा दबाव तंत्राचा वापर करत असतात. परंतु सध्याच्या काळातील मुलं हि तंत्रज्ञान युगातील असल्याने व सध्या संयम आणि सहनशीलता याचा सर्वदूर अभाव असल्याने स्व हिताचं पण जास्तीच बंधनं कोणालाही नको आहे . पुर्वी मुलं आई वडील पालक यांच्या आज्ञेबाहेर जाण्याचा स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती. हल्ली परस्थिती खुप झपाट्याने बदलत चालली आहे . वेळेनुसार संस्कारांचा लोप होत चालला आहे.जीवन घडविणारेच हितशत्रू जाणवत आहेत .अशी भयानक स्थिती निर्माण होत असताना पालकांनी आपली चिंता वाढु न देता वेळेनुरूप आपल्या मध्ये थोडा बदल घडवून मुलांच्या कल्याणासाठी हितासाठी त्यांना मित्राच्या भुमिकेत मार्गदर्शन करावे. म्हणजे जेणेकरून मुलं पण घडतील आणि चिंता पण मिटेल . पण असं सहसा होत नाही पालक पालकांच्या भुमिकेतुन बाहेर पडण्यासाठी तयार नाहीत. आणि पाल्यांना स्वतः हितासाठी योग्य असणारी आई वडील पालकांची भुमिका मुलांना अयोग्य वाटते .हे परस्पर विरोधी चित्र भयानक वास्तव आहे. स्व हित न समजणं या सारखं दुसरं दुर्भाग्य नसतं .पण या सगळ्या मध्ये महत्वाची बाब हिच आहे. कि वेळ प्रसंग अवधानता पाहुण पालकांनी आपली रननिती बदलली पाहिजे .कारण सध्या ज्या पद्धतीने जीवनशैली आहे. त्या अनुषंगाने मुलांना मार्गदर्शन करताना आपण पालक म्हणून रागवण चिडण ,वेळ प्रसंगी मारहाण करणं उपयुक्त ठरण्यासारख नाही. तर मुलांना अगदी त्यांचा मित्र होऊन त्यांच्या सोबत योग्य संवाद ठेवून उचित मार्गदर्शन करणं सध्यातरी हितकारक आहे.हिच वेळेची आणि काळाची गरज आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301