दैनिक चालु वार्ता हिंगोली प्रतिनिधी -प्रमोद नांदरे
कॉंग्रेस चे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढलेली असताना महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष अँड मनोज दादा आखरे यांनी संभाजी ब्रिगेड तर्फे भारत जोडो यात्रेला जाहिर पाठिंबा दिला आहे राहूल गांधी हे भारतामध्ये जी विषमता पसरली आहे आणि जे हुकूमशाही सत्ता आली आहे त्या विरोधात रणशिंग फुंकले ते भारत भर लाखो लोकांसोबत भारत फिरत आहेत आणि पुन्हा एकदा भारतात समता, बंधुता लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेड चा भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे म्हणून भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातील आली असता कळमनुरी येथे संभाजी ब्रिगेड तर्फे यात्रेला पाठिंबा दर्शवत मोफत पाणी वाटप करण्यात आले यावेळी एकूण बावीस हजार पाणी बॉटल संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आला ह्या उपक्रमाची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, जिल्हा उपाध्यक्ष विश्वांभर सुर्यवंशी,
वसमत तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर माखने, गजानन वानखेडे, संदिप पतंगे, गणेश बोधवन, मारोती चंद्रवंशी, सचिन शिंदे, अंकुश पाटील भेंडेगावकर इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते….