दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
तळोदा(प्रतिनिधी)जिल्ह्यात शेकडो पाडे रस्त्याअभावी वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे.बिरसा फायटर्सचे राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,भारतीय अमृतमहोत्सव नुसताच साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य।च्या ७५ वर्षानंतरही आदिवासी पाड्यात रस्ते, वीज,पाणी,आरोग्य,शिक्षण या मूलभूत सुविधा नाहीत हे दुर्दैव आहे.आजही आदिवासींच्या प्रश्नाकडे प्रत्येक सरकारकडून दुर्लक्ष होतांना दिसत आहे.वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाहीत. आजही अनेक पाड्यात बांबूची झोळी करून रुग्ण,गरोदर मातांना ८ ते १० किलोमीटर पायपीट करून रुग्णांना दवाखान्यात आणावे लागते.रस्ता नसल्यामुळे वर्षानुवर्षे गरोदर माता,आजारी रुग्ण,महाविद्यालयीन विदयार्थ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.घर बांधकाम,इतर जीवना आवश्यक साहित्यसह ओझे डोक्यावर घेऊन खडतर प्रवास करावा लागतो.तळोदा तालुक्यातील पालहाबार,कुवलीडाबर,मोकसमाळ, गायमुखी,मोठीबार,विहिरीमाळ, घोडमाग,केलीपाणी,रावलापाणी, टाकली,हातबारी,खर्डी खु ll(नवीन वसाहत),सोजरबार,चीरमाळ आसालमाळ या पाड्यात अद्यापही रस्त्याची सोय नसल्यामुळे मूलभूत सुविधेपासून ही पाडे वंचित आहे.हिच परिस्थिती धडगांव,अक्कलकुवा,शहादा या तालुक्यातील अनेक पाड्यातही आहे.खेड्याच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात.परंतु,अनेक योजना फक्त कागदोपत्री दाखविणे,जिल्ह्यात भ्रष्टाचारांची लागलेली कीड,उदासीन,असंवेदनशील राजकीय नेते यामुळे जिल्ह्यातील खेड्यांची परिस्थिती पाहिजे तेवढी सुधारली नाही.गांभीर्याने लक्ष घालून ग्रामीण भागातील रस्ते,वीज, पाणी,शिक्षण,आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.