दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
या प्रकरणाचा तपास
अंमलदारांकडून करण्यात यावा, या प्रकरणातील पोलिस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी. मुख्य संशयितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी मोहसीन माळेगावकर यांनी केली आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास दि. ५ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा माळेगावकर यांनी दिला आहे.
देगलूर प्रतिनिधी: देगलूर तालुक्यातील सदरील घटना असून मोबाईलचा शोध लागला आहे, तुम्हाला आठ दिवसांत मोबाईल मिळवून देऊ, असे म्हणून फिर्यादीस अगोदर आश्वस्त करणाऱ्या मरखेल पोलिसांकडून मोबाईल चोरी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मोहसीन माळेगावकर यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
मरखेल येथील तहसीन निझामोद्दीन अत्तार या शिक्षकाचा ३५ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या मैदानावरून फेब्रुवारी महिन्यात पळविला होता. अत्तार यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविला. तपासकामात वारंवार फिर्यादीने पोलिसांनी हजर राहण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांना मदत केली. जुलै महिन्यात तपासीक अंमलदार बालाजी पुरी व पोलिस शिपाई रफिक सय्यद यांनी अत्तार यांना पोलिस ठाण्यात बोलावून मोबाईलचा शोध सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतला असून, आठ दिवसांत मोबाईल तुम्हाला देऊ म्हणून
आश्वस्त केले होते.
मोबाईल मिळाल्याची माहिती देणाऱ्या उपरोक्त पोलिस कर्मचाऱ्यांनीच संबंधित संशयितांना पाठीशी घालण्याचे काम केले असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी माळेगावकर यांनी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे, पोलिस निरीक्षक अनिल चोरमल्ले यांच्यासह विद्यमान पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र कुणीही लक्ष दिले नाही.