दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे….
मंठा तालुक्यामध्ये 11 हजार 200 शेतकऱ्याकडे वीज कनेक्शन असून त्यातील अनेकांकडे महावितरणचे 340 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. शिवाय घरगुती ,वाणिज्य , औद्योगिक व शासकीय 14 हजार ग्राहक असून त्यांच्याकडे साडेसात कोटीची थकबाकी आहे.ही थकित बिले वसूल करण्याची मोहीम सुरू असल्याचे कनिष्ठ अभियंता अनिल जंगम यांनी सांगितले.
तालुक्यामध्ये मागील तीन वर्ष सातत्याने अतिवृष्टी झाली.जलसंधारणाच्या कामामुळे सिंचन क्षेत्र वाढत आहे. पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकरी पाण्यावरील विविध पिके फळ पिके घेण्याकडे वळाले असून विजेचाही वापर वाढला आहे. तालुक्यात कृषी पंप धारक अकरा हजार दोनशे शेतकरी असून त्यांच्याकडे 340 कोटीची थकबाकी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बिल सक्तीने वसूल न करण्याच्या सूचना दिलेली आहे .परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाने मागील थकबाकी वगळून चालू विज बिल भरून घेण्यात येत आहे. यासह अनेक गावाचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.त्याचबरोबर कृषी पंपाचे विद्युत रोहित देखील बंद करण्यात आल्याचे आढळून येते. कृषी पंप विज ग्राहकाव्यतिरिक्त तालुक्यात घरगुती , वाणिज्य, शासकीय व औद्योगिक वीज योजनेचे एकूण 14 हजार ग्राहक आहेत.त्यांची साडेसात कोटीची थकबाकी आहे. महावितरणला प्रति महिना दीड कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे परंतु प्रत्यक्षात एक कोटी 20 लाख वसुली होत आहे.
————————————–=विलासराव देशमुख अभय योजनाचा फायदा घ्या.********
महावितरण कंपनीकडून विलासराव देशमुख अभय योजना अंमलात आणलेली असून या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाच्या थकीत वीज बिलात व्याजाची संपूर्ण रक्कम माफ करणे व मुद्दे मुद्दलातील दहा टक्के रकमेला माफी देण्यात येते. उर्वरित रक्कम भरल्यानंतर वीज जोडणी केली जाते.
मंठा उपविभागाअंतर्गत 450 ग्राहकांनी 32 लाख रुपयांचा भरणाकडून वीज जोडून घेतली आहे. या योजनेची 31 डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती , उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार यांनी सांगितले.