दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मंठा.तालुक्यातील ग्रामपंचायतचा प्रचार आता गळ्याला येऊन ठेपला आहे. उरले फक्त दोन दिवस. गल्लोगली दुकानावर चहाच्या टपरीवर वट्यावर प्रचारात चहाचा घोट घेत उमेदवारचा मोठेपणा सांगत गप्पाला रंग येत असून पहिल्यांदा उभा असलेला उमेदवार मी असं करीन तस करी ण त्यानं आमकं केलं मी तमक करून गावाचा विकास करीन मागील सत्ताधाऱ्याचे उकंडे उकरीत आहे. जे सरपंच किंवा उमेदवार राहिलेले मागे काय कार्य केले पुढे काय करायचे हे करीन ते करीन असे पोकळ आश्वासन देत प्रचार जोरात चालू असून एकदा संधी दया अशी मानधरणी करीत मतदानचा जोगावा मागत उमेदवार मतदाराच्या दारात सकाळी सकाळी जात आहे.
मतदार शेतात उमेदवार दारात
ग्रामपंचायतींची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागात सकाळची वेळ मतदारांना भेटण्यासाठी सर्वोत्तम असल्याने बहुतांश उमेदवार मतदारांना सकाळी भेटण्याला प्राधान्य देत आहे.
त्यामुळे ‘सकाळच्या पाहरी उमेदवार आपल्या दारी’ असे 31 गावात चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यात 35ग्रामपंचायतचा कार्यक्रम घोषित करण्यात आला त्यात चार ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्याने 31 ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहे. १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून २० डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र अध्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र त्याआधीच प्रचार सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती हाच असून त्यातच सध्या रब्बी हंगामातील पीक निगराणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंब सकाळी लवकर शेतात जातात. शेतकरी शेतात जाण्याआधी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न उमेदवाराकडून केला जात आहे. अनेक गावात सकाळी सुरू झालेला प्रचार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. शेतकरी शेतात जाणार असल्याने उमेदवार सकाळीच मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे.
‘एकदा संधी द्या गावचा विकास करून दाखवतो’ असे पहिल्यांदा निवडणूक लढविणारे उमेदवार सांगत आहे. तर ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पद भूषविले आहे. परंतू आता ही निवडणूक लढत आहेत असे उमेदवारास गाव नाराजगी दाखवत आहे.
भांडणाला जोर आला
काका पुतण्यात तर कुठे जावा जावात नणंद भावजई निवडणुकीची लढत होत असल्याने राजकारणा बरोबरचं भांडणालाही जोर चढू लागला आहे. बहिण एकीकडे, भाऊ एकीकडे घरा-घरात वाड्या-वाड्यात गल्लोगल्ली निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. गावातील चावडीवर रात्रीच्या सुमारास तरुण कार्यकर्ते शेकोटीजवळ येऊन निवडणुकीच्या गप्पात रंगलेले दिसत होत असल्याने अनेक गटातटातील कार्यकर्त्यात उत्साहात दिसत आहेत.
आताच्या कार्यकरत्यातही झाले बदल
आधुनिक काळात कार्यकर्ते ही आता बदललेले आहेत. पूर्वीच्या काळचा कार्यकर्ता उमेदवाराकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नव्हता. स्वतःच पदरमोड करून प्रचार करत होता. सायकलवर शिदोरी बांधून जनतेला आपल्या उमेदवाराचे म्हणणे पटवून देत होता..
नंतर हाच कार्यकर्ता दुचाकी वर आला. आतातर चार चाकी वाहन असल्याशिवाय कार्यकर्ता घराबाहेरच पडत नाही. आता कार्यकर्त्याची सर्व व्यवस्था करावी लागते. यातही कार्यकर्त्याची वर्गवारी झाली आहे. यात प्रामुख्याने घोषणा देणारे. रॅलीत सहभागी होणारे, वाहनातून प्रचार करणारे असे अनेक प्रकारचे हायटेक कार्यकर्ते आहेत. मात्र, यात प्रामाणिक कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतकेच असल्याचे दिसून येते.
पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांसाठी भोजनावळीत विशेष व्यवस्था
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडत आहे. तर काही नाराज समर्थक कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी रात्रीच्या वेळी ढाबा, बार, भोजनावळीत विशेष व्यवस्था करुन त्यांच्या मनमर्जीने सोय केली जात आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करुन निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून अनेक युक्त्याचा वापर केला जात आहे.
वॉचमनची व खबऱ्या नियुक्ती
गावातील हालचालीला वेग आला असून प्रत्येक कॉर्नरवर मतदारावर वॉच ठेवण्यासाठी कोण कोण्याची घरी जातो कोण कुठे जातो कोण काय बोलतो हे जाणून घेण्यासाठी गॅल्लोगल्ली दुकानावर काही प्रचारक खबऱ्याची भूमिकेत दिसून येत आहे.