दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी परतुर/…
उपविभागीय अधिकारी परतुर यांच्यामार्फ दि.१६/१२/२०२२ रोजी मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन निवेदनात पुढे म्हटले आहे कि जालना जिल्ह्यातील खरीप उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळ मदती पासून वंचित ठेवु नका जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात लहरी पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे एकरी ३ किंटल कापूस कमी, एकरी ४ किंटल सोयाबीन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून सरसकट अनुदान मदत करण्यासाठी कार्यवाही करण्या यावी निवेदनात म्हटले आहे कि जालना जिल्ह्यातील खरीप उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळ मदती पासून वंचित ठेवु नये, जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात लहरी अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कमी अधिक पावसामुळे खरीप पीकांचे खूप मोठे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे,करण हंगामी पाऊस व परतीचा पाऊस लहरी सतत पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे, एकरी क्विंटल सोयाबीन व्हायला पाहिजे होते त्यात ३/४ क्विंटल घट झाली आहे एकरी सोयाबीन पिकाचे ८ ते ९ हजार रुपये नुकसान झालेले आहे, तसेच आदिकच्या पावसामुळे कापसाचे उत्पादन ३०/३५ टक्याने घटल्यामुळे नुकसान झाले आणि कापूस एकरी ९ ते १० क्विंटल व्हायला हवा होता पण कधी कमी तर कधी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठे नुकसान होऊन ३ /४ क्विंटलच्या उत्पादनात घट होऊन जवळपास एकरी किमान २२ हजार रुपये नुकसान झालेले आहे, यावर्षीच्या २०२२ या वर्षामध्ये लहरी पाऊस पडल्यामुळे सगळ्याच खरी पिकांच्या उत्पादनात ३० ते ३५ घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, पारंपारिक पद्धतीने अनेक वर्षापासून उघड्या डोळ्यांनी घाट्याचा धंदा करणारी देश सेवा म्हणून काम करीत असलेला शेतकरी याला राज्य आणि केंद्र सरकारने अडचणीच्या वेळी मदत करायला हवी मदत केली तरच शेतकऱ्यांना सहकार्य होईल अन्यथा हळूहळू एक एक दिवस शेतकरी शेती पासून बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही? हि सत्य गोष्ट टाळून चालणार नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील खरीप उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळ मदती पासून वंचित ठेवु नका सरसकट अनुदान देऊन मदत केलीच पाहिजे.जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवु नका सरसकट जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यातील खरीप पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे ओला सरासरी पेक्षा लहरी पाऊस पडल्यामुळे उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले अनुदान आर्थिक सहकार्य मिळावे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक नुकसान भरपाई मदत करणार होते मग काय झाले? आठ-दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करा नसता खरीप उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला…