दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
तुरीच्या शेंगा निब्बर टच झाल्यामुले आता ग्रामीण भागात शेंगा तोडून त्यानंतर त्या उकडून खाण्याची चव काही वेगळीच आहे. त्यामुळे उकडलेल्या तुरीच्या शेंगांची मेजवाणी लहानमोठ्यांसोबत आवडीची झाली आहे.
शेतशिवारात काही भागात तुरीचे पीक बहरले असून, जेथे शेंगा टंच भरल्या, तेथील शेतशिवारातील तुरीच्या शेंगा तोडून आणल्या जात आहेत. शिवाय कुठे शेंगातील दाणे काढून भाजी, वडे बनविले जात आहेत. आता बाजारपेठेतही तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकालाही तुरीच्या चव पाहवयास मिळाली.
आता घराघरात भाजी, सोल्याची चटणी बनवली जात असून थंडीच्या दिवसात याची खाण्याची मजाच अलग असते. प्रत्येक घरातील गृहिणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुरीच्या शेंगांपासून पदार्थ बनवितात आणि आपसात संवाद साधताना त्याचा गौरवाने उल्लेखही केला जातो. शेतशिवारात सुध्दा शेतकरी मडक्यात भगून्यात विटेच्या किंवा दगडाच्या चुलीवर तुरीच्या शेंगा भांड्यात उकडलेल्या शेंगाची चव घेतांना दिसत आहे. तर काही शेतकरी तुरीचा हुरडाही भाजून त्याची चव घेत आहेत.
एकंदरीत थंडीच्या दिवसात उन्हात बसून उकडलेल्या तुरीच्या शेंगा खाण्याची मजाच अलग.