दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी याने, आपल्या देशाचे पंतप्रधान विश्व गुरू नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहे. पाकिस्तान सारखा तुच्छ देश जिथे एक वेळचे जेवण जनतेला मिळत नाही, अश्या देशाच्या मंत्र्याने भारत देशाचा अपमान केला आहे. बिलावल भुट्टो च्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज भाजपा जिल्हा जालना, भाजपा चे सर्व मोर्च्या तर्फ तीव्र आंदोलन स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात करण्यात आले…
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश सामर्थशाली झाला आहे, यापुढे पाकिस्तान भारतावर दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची तयारी व ताकद आहे त्यामुळे पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांनी जालना येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल जरदारी भुट्टो यांचा निषेध व्यक्त करताना व्यक्त केले.
यावेळी निषेध व्यक्त करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे म्हणाले की, हताश झालेल्या पाकिस्तानकडून आता भारत देशाविषयी द्वेष भावनेने बोलल्या जात आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्वाचे स्थान मिळवून देत आहे. भारताकडे आता वाकड्या नजरेने पाहिल्यास भारताकडून पाकिस्तानास जशाच तसे उत्तर देण्यास भारत देश सक्षम आहे. भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया आता पाकिस्तान करू शकत नाही कारण दहशतवाद पोहोचवीणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान आता कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे भारत देशा या प्रकारची वक्तव्य केल्या जात आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारचा भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या निषेध कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (आबा) दानवे, भाजपा प्रदेश सदस्य रामेश्वर भांदरगे, अल्पसंख्यक प्रदेश महामंत्री अतिक खान, जिल्हा संघटन सरचिटनीस सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, अर्जुन गेही, भागवत बावणे, बाबासाहेब कोलते, प्रा.राजेंद्र भोसले, सुनील खरे, संजय आटोळे, सुनील पवार, कपिल दहेकर, शर्मिष्ठा कुलकर्णी, बबनराव सिरसाठ, डॉ.रमेश तारगे, रोहित नलावडे, सोमेश काबलिये, सौ.स्नेहा जोशी, रोषण चौधरी, विजय कामड, संजय डोंगरे, चेतन देसरडा, गेंदालाल झुंगे, पवन झुंगे, विकास कदम, अमोल धानुरे, आनंद झारखंडे, सय्यद इम्रान, सोपान पेंढारकर, संदीप बटावाले, अमन मित्तल, संतोष खंडेलवाल, उमेश पेंढारकर, बबलू नंद, राहुल यादव, राजू गवई, समीर शेख, रिजवान जहागीरदार, आकाश देशमाने, शिवाजी गवारे, सुधाकर शिंदे, भरत मदन, गंभीरराव पडूळ आदींसह मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.