दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरात वाळू उपसा व वाळू वाहतूक बंद असली तरीही शहरातून मात्र वाळू वाहतूक अखंडितपणे सुरूच आहे. याविषयी महसूल प्रशासनास विचारणा केल्यास महसूल प्रशासनातर्फे स्टॉक करण्यात आलेल्या वाळूची वाहतूक होत असल्याच्या बतावण्या करण्यात येत असल्याने महसूल प्रशासनास वाळू चोरीस उत्तेजन देत असल्याचे निदेर्शनास येत आहे.
देगलूर पोलीस स्टेशन अंतर्गत डीबी पथ आहे. या पथकानुसार शहरातील वाढत्या चोरी वाळूतस्करांसह महसुल प्रशासनही आपापली पोळी भाजण्यात दंग आहेत. तसेच शहराच्या सामाजिक स्वास्थ्यास हानी ।
जिल्हाप्रशासनाच्या आदेशाने गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील सर्व वाळु घाटातील वाळू उपसा व वाळू वाहतूक बंद आहे. देगलूरातील तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाळू वाहतुकीवर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला होता व वाळू वाहतुकीच्या वाहणांवर कारवाई करून दंड आकारला होता. वाळु तस्करांचे धाबे दणाणले होते परंतु आता देगलूर शहरातून सौम्या शर्मा यांची बदली झाल्यानंतर वाळू वाहतूक अखंडितपणे सुरू हे याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की, तेलंगाना प्रांतातील एका अज्ञात इसमाने देगलूर शहरात वाळूचा भरमसाठ साठा साठवून ठेवला आहे. या वाळू साठ्यातून टिप्परद्वारे देगलूर शहरासह कर्नाटक, तेलंगाना या प्रांतात वाळू वाहतूक अखंडितपणे `सुरू आहे. या वाळूची वाहतूक ठराविक पणे सकाळच्या सुमारास आणि संध्याकाळच्या सुमारास सुरू असते दर अर्ध्या तासानंतर एक वाळूची गाडी देगलूर मार्गे निघते हा सर्व प्रकार येथील महसूल प्रशासनास माहीत असून सुद्धा प्रशासनाने आपल्या डोळ्यावर हात
करण्यात आलेल्या साठ्या मधून या वाळूची वाहतूक होत आहे परंतु वास्तवामध्ये देगलूर शहरातील वाळू माफिया वाळुचा नियमबाह्य नदीपात्रातील वाळू घाटातून वाळू उपसा करीत असून छुप्या मार्गानि वाळूची वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अशा छुप्या पद्धतीने महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू वाहतूक होत असली उद्भवत आहे. तरीही गरजवंतांची मात्र आर्थिक पिळवणूक होत असल्याचे दिसते कारण ही वाळु अव्वाच्या सव्वाभावाने वाळूची विक्री केली जाते.
वाळूतस्करांसह महसुल प्रशासनही आपापली पोळी भाजण्यात दंग आहेत. यावर लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर लक्ष घालून या वाळू माफयावर अंकुश आणला पाहिजे व ओरलोड वाहतुकीवर निबंध लागला पाहिजे तहसीलदारांना वेळोवेळी निवेदन व चर्चा करून पथक स्थापन करा पन अजून तर कुठे रस्त्यावर प्रशासनाचा पथक दिसत नाही लवकरात लवकर पथक स्थापन करून हार गाडीची चौकशी करण्यात यावी अन्यथा या भोंगळ कारभारामुळे जनते मध्ये प्रशासनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.