दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू हे रोखठोक म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील एक हुनरी नेता आहे. पण हल्ली माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू दिवसेंदिवस शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज होताना दिसत आहेत. जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून जाहीर नाराजी बोलून दाखवली होती.
मात्र अजून ही त्यांना सरकारमध्ये मंत्री पदाची संधी दिली नाही.
पहिल्या फेरीमध्ये बच्चू कडू यांना मंत्रीपद न मिळणे हे खरोखर महाराष्ट्रातील जनतेसाठी आश्चर्याचे बाब होती. कारण बच्चू कडू हे यापूर्वी तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री पदावर होते. आणि चालू मंत्रीपद सोडून त्यांनी शिंदे गटा सोबत सामील होऊन चुकीचा निर्णय घेतला नाही ना ? असा प्रश्न बच्चू कडूंच्या मनात निर्माण झालाच असावा असं वयक्तिक मला वाटत. आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण वाटतं. कारण महाराष्ट्राच्या जनतेचा माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे पहिला वेगळा होता आणि आता तो वेगळा आहे. पण अजून कळलेलं नाही की बच्चू कडू सारखा हुनरी सच्छा नेता रोखठोक बोलणारा नेता ठाकरे सरकारमध्ये काहीच प्रॉब्लेम नसताना चालू पदावर ठोकर मारून शिंदे गटामध्ये सामील होऊन ( सहकार्य ) काय मिळवलं? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला तीन महिन्यापूर्वीच पडलेला आहे ?
दरम्यान आता पुन्हां बच्चू कडू यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. राज्यात पदवीधर व शिक्षक निवडणुका लागल्या आहेत. मात्र या निवडणुकीची भाजप – शिंदे गटाने दखल न घेतल्याने ही निवणुक प्रहार स्वतंत्र लढणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे.
आता ही बच्चू कडू यांची नवीन खेळी तर नाही ना शिंदे फडणीस गटावरती दबाव टाकण्याचीं कारण बच्चू कडू यांनी मंत्रीपद न मिळाल्याने वारंवार आपली खद खद या तीन चार महिन्यांमध्ये जाहीरपणे बोलून दाखवली आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रहार संघटना व मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधर राज्यातील पाचही मतदार संघात लढणार असल्याचे आमदार कडू यांनी जाहीर केले आहे. आमदार बच्चू कडू काल माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक भाजप-शिंदे गट एकत्र लढणार होतो मात्र कोणीच दखल घेतली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रस्तावाची दखल घेतली नसल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तर ते म्हणाले आम्ही या निवडणूकीसाठी दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे प्रहार संघटना आणि मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही जागा लढवणार आहोत. बच्चू कडू यांनी उमेदवार देखील जाहीर केले आहेत.
माजी मंत्री बच्चू कडू यांना पुन्हा या निर्णयासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या आणि त्यांच्या चाहत्याच्या शुभेच्छा असतील पण निर्णय चुकू नाही याची त्यांनी काळजी घ्यावी अशाही त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा असतील असं मला वाटतं.
डि. एस. लोखंडे पाटील
मुख्य संपादक – दै चालु वार्ता