दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
भाजपने काही केले नाही भाजप खोटे बोलते त्यांच्या मागे जनतेनी राहू नये खरे बोलणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे राहावे असे प्रतिपादन काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी सोनखेड येथे काँग्रेसच्या दि. २६ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या हात से हात जोडो’अभियान पूर्व बैठकीला मार्गदर्शन करताना केले.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपुर्ण देशभर प्रचंड प्रतिसाद मिळून भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असून तीचा समारोप दि.२६ जानेवारीला जम्मू काश्मीर ची राजधानी श्रीनगर येथे होत असुन यानंतर दि.२६ जानेवारी पासून संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाच्या वतीने हात से हात जोडो अभियान सुरुवात होत आहे.
राज्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो अभियानाची तयारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोळे , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जोरदार केली असुन या अनुषंगाने दि.२४ जानेवारी २०२३ रोजी लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षीण मतदार संघातील सोनखेड येथे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने हात से हात जोडो अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे होते तर प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कार्यक्रमांचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे , काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे,लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा शहराध्यक्ष वसंत पवार, काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, नांदेड दक्षिण काँग्रेसचे महासचिव मधुकर पाटील दिघे, लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार, लोहा न.पा.चे गटनेते पंचशील कांबळे, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास बंडेवार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे,पंकज परिहार,अनिल दाढेल, सायाळचे सरपंच अण्णाराव पाटील पवार,कारेगावचे चेअरमन दता पाटील दिघे, अल्पसंख्याक चे शरफोदीन शेख, पिंपळगावचे सरपंच प्र. दयानंद पाटील येवले, सोनखेड सर्कल प्रमुख प्रकाशराव मोरे,बंडू मोरे, कैलास मोरे, सोनखेडचे गण प्रमुख राजेश उराडे, आंबेसांगवीचे माजी सरपंच गणपतराव कदम,भेंडेगावचे सरपंच विठ्ठल कदम,शेवडीचे माजी उपसरपंच तुकाराम लुटे,दगडगावचे माजी चेअरमन बाबुराव ढवळे,
यांच्यासह सोनखेड सर्कल मधील काँग्रेसचे सर्व आजी, माजी सरपंच, चेअरमन, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. काँग्रसचे राष्ट्रीय नेते खा. राहूल गांधी यांनी ३५०० किं.मी.ची भारत जोडो यात्रा काढली. काँग्रेसने ७० वर्षात देश घडविला सुई पासून विमाना पर्यंत , अनेक धरणे, कारखाने निर्माण केलेत . देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची तहान भागविली विष्णूपुरी, जायवाडी सह राज्यात ३७७५ छोटी – मोठी धरणे बांधलेत . माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथे अनेक पुल बांधलेत नांदेड जिल्ह्यासह राज्याचा विकास केला. भाजपने खा.संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनाकारण जेल मध्ये टाकले. भाजपने नोटबंदी केली काही फायदा झाला नाही.जीएसटी वाढविली.
राज्यात मागील दिवसात कोरोना च्या काळात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आपण वाचलोत महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. भाजपने काही केले नाही भाजप खोटे बोलते त्यांच्या मागे जनतेनी राहू नये खरे बोलणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे जनतेनी राहावे हे काँग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो अभियानात घरोघरी जाऊन सांगावे असे आ. मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.
तसेच यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मोरे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मोरे यांनी केले तर आभार विलास मोरे यांनी मांडले.