दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – भारत हा कृषिप्रधान देश समजला जातो याच कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांने वर्षेभर शेतात राबुन काबाडकष्ट करून त्यांच्या शेतात पिकवलेला माल हा कवडीमोलाने घेतला जातो तोच शेतीतील माल ऊन वारा पाऊस , दिवसांची राञ करुन कसा पिकवला जातो व त्यासाठी कसे कष्ट करावे लागते हे शेतकऱ्यांनाच माहिती आहे. आपल्या ताटातला अन्नाचा कण अन् कण शेतकऱ्याच्या घामाने पिकला आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवणे बंद केलं तर आपण काय खाणार ? अजून तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यांमध्ये अन्न निर्मितीची सोय झालेली नाही. त्यासाठी सरकारने पण शेतकऱ्यांच्या व्यथाकडे व त्यांच्या शेतीमालाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
यावर्षी अतिवृष्टीनं पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. जे पीक वाचलं त्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं भाव राहिलेला नाही. यावर्षी कापसाचा उत्पादन खर्चही भरुन निघणार नाही, अशी अवस्था आहे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसाची झाली आहे.
कापसाच्या भाववाढीची बळीराजाला प्रतिक्षा
कापसासाठी जमीनीच्या मशागती पासुन कापुस लावणे , पाळी घालणे , निंदणे , फवारणी करणे , खत घालणे , औषध फवारणे , व त्यांचा निसर्गाची अवकृपा अतिवृष्टीचा सामना करणे , कापुस वेचणीसाठी मजुरांना एका क्वींटलसाठी ८०० ते १००० रूपये देणे व कापुस बाजारात आणण्यापर्यंत पर्यंत बळीराजाला खटाटोप करावा लागत आहे पुरेसा भाव असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी अद्याप कापुस बाजारात आणण्यास पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.सध्या कापसाचे बाजार भाव हे उलट्या दिशेने सुरू असून, यामध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मागील वर्षीचा विचार केला तर कापसाला भाव जास्त मिळाल्याने यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बांधवांना असल्यामुळे कापूस विक्रीसाठी बाहेरच काढला नसल्याने ८५ टक्के कापुस अजून देखील शेतकर्यांच्या घरातच आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा
सततची नापिकी, अतिवृष्टी , कर्जबाजारीपणा, कुटुंबातील लहान मोठे आजारपण, मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, लग्न आदींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस येत असुन त्यामध्ये बाजारपेठत शेतीमाला कवडीमोलाचे स्वरूप असल्याने बळीराज्याची व्यथा व समस्या ना सरकार जाणार समजुन घेणार ना लोकप्रतिनिधी अशी अवस्था व व्यथा पहावयास मिळत आहे.