दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले कसे? यावर जनतेसमोर चर्चा करू. ही चर्चा जिथे तुम्ही करायला तयार आहात तिथे मी येईन. वेळप्रसंगी वर्षावरही चर्चेसाठी बोलावलं तरीही यायला तयार असल्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.
शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे जालन्यातील सोमठाणा येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे. महाराष्ट्राचे ५ तुकडे करायचे आहे; असं सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते अशी कोपरखळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावली.
महाराष्ट्राला धोके देणारे सरकार
स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे. मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला; याचा मी आनंद साजरा करत नाही असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले. हे त्यांनी सांगून दाखवावं असं आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.