दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
या प्रसिद्ध पत्रकार द्वारे आव्हान करण्यात येते आहे, परतुर ९७ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना धडक विहिर मिळण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना विहिरीचा लाभ घेण्यासाठी संपर्क करावा,कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मान्य झाली, मा.मुख्यमंत्री,यांना जिल्हाधिकारी जालना यांच्यामार्फत दि.२५/१/२०२३ रोजी मा.जिल्हाधिकारी जालना यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन परतुर तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ७ वर्षापासून परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरी मिळत नाहीत, म्हणून मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन, जिल्हा परिषद जालना यांनी गटविकास अधिकारी यांना आदेश देऊन परतुर तालुक्यातील शेतकऱ्यांना धडकच्या विहिरी मिळणार आहेत,करण गटविकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती परतुर यांनी दि.३/१/२०२३ रोजी पत्रक काढून पत्रकात म्हटले आहे, कि परतुर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे प्रस्ताव सादर करणे, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत संदर्भ क्रमांक २ अन्वये शासन स्तरावर वैयक्तिक सिंचन विहिरी लाभार्थ्यांचे प्रस्ताव घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे तरी आपल्या ग्रामपंचायत मधील पात्र लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव ग्रामसभा मार्फत लाभार्थ्यांची निवड करून ग्रामपंचायत वैयक्तिक सिंचन विहिरीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी,गट विकास अधिकारी यांनी माहितीस्तव प्रति मा. जिल्हाधिकारी जालना, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना,मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांना हे पत्र पाठवले आहे, कारण ७ वर्ष झाले ९७ गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरी मिळत आहेत, परतुर तालुक्यातील प्रत्येक गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने गोरगरीब शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत, तसेच जनहितार्थ झगडणारे नेतृत्व मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांचे अभिनंदन आभार व्यक्त ह्या भागातील शेतकरी करीत आहेत…