दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड -समाज व्यवस्थेत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावात असलेल्या व देशात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेल्या वृत्तपत्र व माध्याम सामुह तील बांधव साठी त्यना वृत्तकान करण्यासाठी इतर सांस्कृतिक कार्यक्रम साठी शहरात सर्व सोयीसुविधा ने युक्त सुसज्ज असे पत्रकार भवन लवकरच उभारणार असल्याचे प्रतिपादन आ डॉ तुषार राठोड यांनी जन संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात 8 रोज बुधवारी केले आहे .
शहरातील काही माध्यम सामुहात काम करणाऱ्या व्यक्ती ची विविध क्षेत्रात निवडी झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यना सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आ राठोड बोलत होते
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे, शहरद्यक्ष किशोरसिह चव्हाण, डॉ वेंकट सुभेदार भोसले, राजू घोडके,जगदीश बियाणी, नागोराव श्रीरामे, विनोद दंडलवाड, उत्तम बनसोडे, नागसेन लोहाळे, संगमेश्वर देवकते ,गजानन साखरे, खाजा धुंदी, सुधीर चव्हाण,बबन ठाकुर, करण रोडगे, राजू रणभिडकर, पिंटू बदेवाड आदिजन उपस्थित होते
संदीप कामशेट्टे यांची नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ चे जिल्हा संघटक पदी निवडी झाल्या बद्दल तर ॲड आशिष कुलकर्णी यांची अभिवक्त संघाचे उपाध्यक्ष पदी मेहताब शेख यांची जीप हायस्कूल मुलीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी निवडी बद्दल नामदेव श्रीमंगले यांची नाभिक समाज संघटना चे तालुका द्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आ डॉ तुषार राठीन याच्या वातिने सन्मान करण्यात आला
आ राठोड म्हणाले की माध्यम समूहात काम करणाऱ्या प्रतिनिधी चे वृतकन करण्याचे काम अत्यंत महत्वपूर्ण आणि जबाबदारी चे आहे समाज व्यवस्थेत असलेले सुधारणा त्रुटी दूर करण्यासाठी सर्व सामान्य नागरिक सह शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्न मांडण्यासाठी विकास कामे मार्गी लावण्यासाठी पत्रकार बांधव लेखणी द्वारे नेहमी अग्रेसर असतात उन्ह पाऊस थंडी ची अथवा रात्री बेरात्री ची तमा न करता सतत अविरत ते कार्यारत प्रयत्नशील असतात तालुक्यातील पत्रकार बांधव यांनी मागील चाळीस वर्ष पासून पत्रकारिता क्षेत्रात आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे त्यांचा आम्हास अभिमान आहे यापुढे ही पत्रकार बांधव यांनी आपले कर्तव्य निष्ठणे चोख पने पार पाडावीत असे आवाहन केले आहे राज्य शासन कडे पत्रकार बांधव यांच्या विविध मगणय्या प्रलंबित आहेत त्या बाबत येत्या काळात पुढाकार घेवू असे आश्वासन त्यांनी दिली आहे
ॲड आशिष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले पत्रकार चे ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी स सामोरे जावे लागते त्यांच्या शासन स्तरावर असलेल्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या मंजूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी केली
शेख बबलु मुला, रणजित जामखेडकर, चरणसिंह चौहान, ॲड मिलिंद कांबळे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे सूत्र संचलन किशोर चौहान यांनी तर आभार प्रदर्शन मेहताब शेख यांनी व्यक्त केला आहे.