दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुका,पांगलोली निवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेठ कौचाली यांचे दिनांक २५/०२/२०२३ रोजी पुणे येथे हृदयविकाराचे तीव्र धक्याने उपचारादरम्यान रात्री १०-५० वाजता दुःखद निधन झाले.निधना समयी त्यांचे वय ६८ वर्षे होते.त्यांचा अंत्यदर्शनासाठी पांगलोळी निवासस्थानी खासदार सुनिल तटकरे,माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि जिल्हा भरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते,पदाधिकारी,शासकिय आजी माजी अधिकारी,कर्मचारी,मित्रपरिवार,समाज ज्ञाती परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी सर्वधर्मीयांचे वतीने अलीशेठ यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहताना अलीशेठ म्हणजे सावळी सारखा पाठीमागे रहाणारा माझा एक आधारवड आज हरपला त्यांचे निधनाने झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.हिंदु मुस्लिम सामाजिक एक्य जपणारा,राष्ट्रभक्त ज्येष्ठ सहकारी अली शेठ यांचे दुदैवाने दुःखद निधन झाले.आजचा दुर्दैवी दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यात येईल असे वाटले नव्हते पण दुर्दैवाने तो आला आहे याचे अतीव दुःख होत आहे.खासदार सुनिल तटकरे या वेळी भावूक होताना माझ्या सहकाऱ्यास श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या कडे शब्द शब्द नाहीत गेली ४० वर्षे माझे सहकारी असलेले अलीशेठ आज पासुन माझ्या समावेत नाहीत ही कल्पना मला सहन करता येत नाही.अलीशेठ कौचाली यांनी आमच्यासह आमदार आदिती,आमदार अनिकेत आदी साऱ्यांना त्यांचे कुटुंबातीलच आहोत असे मानल.त्यांनी सर्वधर्म समभाव मनामध्ये ठेवत विकासात्मक धोरण हे केवळ पांगलोळी,म्हसळा तालुका पुरते सिमित न ठेवता संपुर्ण जिल्ह्याचा विकास कामांचे धोरण अवलंबले होते. अनेक वेळा धार्मिक वातावरण तयार होत असताना राष्ट्रभक्त अलिशेठ यांनी आपले जीवन याच कारणासाठी समर्पित करत प्रदीर्घ अनुभव जवळचा सहकारी असल्याने मला वेळोवेळी आला असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगीतले.४० वर्षाचे ऋणनुबंध जोपासत असताना त्यांचे कर्तृत्व,सहयोग लाभला.पांगलोळी गावात शैक्षणीक, सामाजिक विकाासाठी सातत्याने प्रयत्न केलेच परंतु असा एक क्षण गेला नाही की ज्या ज्या वेळी मी त्यांचे संपर्कात आलो तेव्हा विकास,शैक्षणीक काम,सर्वधर्म समभाव,धर्म निरपेक्षता अशा बाबतीत कधी चर्चा केली नाही असे कधी झाले नाही याची आठवण खासदार सुनिल तटकरे यांनी अली शेठ यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहताना आमच्यासह साऱ्यांच्या वतीने त्यांना ईश्वर चरणी सद्गती लाभो अशी प्रार्थना केली.