दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- आनंदा वरवंटकर
कंधार/पेठवडज :- ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभाग अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून अकरा वर्षापासून काम केलेल्या संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना करत असून याच मागणीसाठी राज्यातील सर्व संगणक परिचालक २७ फेब्रुवारी पासून काम बंद ठेवून बेमुदत संपावर जाणार आहेत राज्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. १ मार्च २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संगणक राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे साहेब यांनी माहिती दिली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहे परंतु शासनाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परी चालकावर नेहमी अन्याय करण्यात आलेला असून ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदरच असलेल्या तुटपुंजा ६००० मानधनात १०००ची वाढ महागाईच्या काळात मासिक मानधनात संगणक परिचालक यांनी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाहीत मागे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संघटनेच्या वतीने २७ व२८ डिसेंबर रोजी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यातआले होते त्यांची दखल घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन साहेबांनी लेखी आश्वासन दिले त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी ग्राम विकास मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशी नुसार संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला .सदरची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला सध्या ग्राम विकास विभागाने वित्त विभागात सुधारित आकृतीबंधाची फाईल पाठवली आहे परंतु त्यावर निर्णय होऊन निधीची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी व प्रमुख मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पासून ग्रामपंचायत संगणक परिचालक स्तरावर संगणक परिचालकाला असलेली सर्व कामे बंद ठेवून बेमुदत संप करण्यात येणार असून १ मार्च २०२३ रोजी राज्यातील सर्व संगणक परिचालक हजारोच्या संख्येने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.
मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. फडणवीस साहेबांना आश्वासनाची आठवण करून देणार आहोत .महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एकनाथ शिंदे हे २०१८ मध्ये युती शासनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे संघटनेच्या आंदोलनाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता .परंतु अद्याप त्यांनी संगणक परिचालकांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे तसेच सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा अनेक वेळा विधानसभा सभागृहात व संघटने च्या बैठकीत संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते आत्ता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ विभागाकडे संगणक परिंचेचालकांचा सुधारित आकृतीबंधानुसार पद निर्मिती व किमान वेतनाची फाईल ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे या आजाद मैदानावरील आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देऊन संगणक परिचालकाचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे राज्याध्यक्ष श्री सिद्धेश्वर मुंडे साहेब यांनी माहिती सांगितली आहे.