दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील वाळोली गावच्या मुख्य रस्त्याची सध्या दुरवस्था झाल्यामुळे वाहतुक जीवघेणी ठरत असल्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.
कासारी नदीकाठी वसलेल्या वाळोली गावच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण मागील दहा वर्षापूर्वी करण्यात आले होते.त्यामुळे रस्त्याला जागोजागी शेकडो खड्डे पडले आहेत.त्यातूनच नियमीतची वाहतुक सुरू आहे.खड्य्यातून वाहतूक करून लोकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचा कार्यक्रम करून ग्रामस्थांची फक्त बोळवण केली होती.त्यामुळे ओबडधोबड भरलेले खड्डे काही दिवसामध्येच विस्कटले आहेत.व त्याजागी पुन्हा खड्डे पडले असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे किती दुर्लक्ष आहे हे यातून दिसून येते.नवीन रस्त्यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली.मात्र वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आले आहे.
चौकट
पंधरा वर्षापासून बस सेवा बंद
गाव तिथे एस.टी.हे ब्रिदवाक्य असताना देखील नियमित सुरू असलेली एस.टी.सेवा पंधरा वर्षापूर्वी अचानक बंद करण्यात आली.एस.टी.सेवा नसल्यामुळे ग्रामस्थांना व विद्यार्थ्थांना नियमित पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वस्तीची गाडी तरी सुरू करावी अशी मागणी होत आहे.