दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी : राज्यात सात कामगार संघटना एकत्र येत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती द्वारा अंगणवाडी कर्मचारी भरघोस मानधन वाढ या प्रमुख मागणीला समोर करत बेमुदत संप पुकारला होता मात्र कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची मानसिक तयारी दर्शविली असतांनाच अचानक संपकरी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता अल्प मानधन वाढीवर अंगणवाडी कृती समिती ने सरकार समोर शरणागती पत्कारली आणि संप मागे घेतला मात्र आज ही माया परमेश्वर(नगर) सारख्या अंगणवाडी संघटना बेमुदत संप करत कर्मचाऱ्यांसाठी लढा देत आहे पण कृती समितीने तसे केले नाही एकूणच पाहता सर्व नाट्यमय घडामोडी पाहता संपकरी कर्मचाऱ्यांची कामगार संघटना कडून अस्सल फसवणूक केली असल्याचे निदर्शनास येते कार्ल मार्क्स या जागतिक तत्ववेत्याची प्रेरणा घेत जन्मलेल्या कामगार संघटना सत्ताधाऱ्याच्या दावणीला बसत कामगारांचे आर्थिक शोषण करत व्यक्तिकेंद्रित झाल्यात यात
कार्ल मार्क्सच्या समाज सत्तावादाला हरताळ पासून कार्यरत असल्याचे त्यांच्या कार्यशैलीहून लक्षात घेण्यासारखे आहे राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची गेल्या अर्धशतकापासून मानधन वाढ झाली नाही,अनेक दशकापासून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा नाही यासह भर मानधन वाढ सुट्या, कौटुंबिक संरक्षण, उच्च शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरण्यात येत नाही या कर्मचारी हिताच्या मागण्या कामगार संघटना पुढे न रेटता कुचकामी मागण्या पूर्ण करून(मोबाईल) भांडवलशाहीला खतपानी घालून समाज सत्तावादाला सुरुंग लावत कामगार विचारधारेला बगल देतात भरघोस मानधन वाढ या शीर्षकाखाली राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तन-मन-धनाने बेमुदत संप पुकारला होता आणि अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला संपाद्वारे वेठीस धरून आणि विरोधी पक्षासह इतर आमदारांची साथ घेत निदान दोन ते अडीच हजार रुपये मानधन वाढवता आले असते पण असे न करता कामगार संघटनांनी फक्त १५०० रुपये वाढीवर आठ दिवसात अंगणवाडी कृती समिती ने संप मागे घेतला आणि इतर मागण्या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागला नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आणि अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्त्री शौर्य दाखवत कृती समितीच्या अपकृतीचा जाहीर निषेधही व्यक्त केला आहे त्यापेक्षा विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, आ.धनंजय मुंडे,आ.अदिती तटकरे,आ.अबू आझमी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात,आ.कुणाल पाटील यांच्यासह १०० आमदारांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उचलून सभात्याग केला आणि विधानसभेच्या पायऱ्यावर सरकार विरोधी घोषणाबाजी केली मात्र संपकरी कर्मचाऱ्यांची साथ विरोधी पक्षातील आमदार किंवा
प्रश्न उचलणाऱ्या आमदारांना मिळाली नाही आणि खास करून अंगणवाडी कृती समितीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत संप मागे घेतल्याने सरकारने भरघोस वाढ न करता अल्प मानधन वाढ केली कामगार संघटनांनी अधिवेशन काळाचा विचार न करता अल्पावधीत गाशा गुंडाळल्यामुळे प्रश्न उचलणाऱ्या आमदारांची कोंडी झाली हे उभ्या महाराष्ट्रान पाहिलं आहे आता सध्यस्थिती मध्ये कामगार संघटनानी बेमुदत संपाला आलेलं अपयश आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी? सध्या केंद्राची मानधन वाढ हे गाजर दाखवत शेकडो कोटीचा लढा निधी जमा करण्यासाठी कामगार संघटनेने फंडा चालवला आहे स्वराज्यात स्वहीतासाठी शासनाच्या ताटा खालचं मांजर बनून संपकरी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून कामगार संघटना केंद्रात काय तीर मारणार? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे एवढे मात्र सत्य