दैनिक चालु वार्ता म्हसळा- रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
थंडी संपली आणि उन्हाळा वाढू लागला तसा कोकणातला वणव्यांचा प्रश्न प्रतिवर्षी ज्वलंत बनू लागतो. बहुतांश तरुणांनी धरलेला मुंबईचा रस्ता त्या मुळे दिवसेंदिवस शेतीविना पडिक राहणारी जमीन त्या जमिनीत प्रतिवर्षी वाढणारे गवत आणि ते नष्ट करण्यासाठी नापिक ओसाड जामिनी वर होणारा खर्च कोकणातील लोकाना न परवडणारा ठरत आहे.अशाच मालकी जमिनीतील वणव्याने रस्त्या लगत असलेल्या वडाचे झाड पेटले आणि नंतर ते राज्य मार्गावर कोसळले होते त्या मुळे तब्बल १ तास गोरेगाव- म्हसळा रस्त्यावरील वाहतुक रोखून धरल्याची घटना खामगावा नजिक घडल्याचे सांगण्यात आले.दोनही बाजूने शेकडोनी वाहने अडकली होती.एस.टी. प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी तात्काळ श्रीवर्धन-माणगाव एसटी स्थानक,विभाग नियंत्रक पेण ,वन विभाग म्हसळा,बांधकाम विभाग महाड- श्रीवर्धन आदी विभागांना दूरध्वनीने सांगुन मार्ग खुला करून घेतला.खाजगी जामिनीत मोठया प्रमाणात वाढणारे गवत नष्ट करण्यासाठी लावले जाणारे वणवे हेच मुख्य कारण असावे हे अद्यापी एक न सुटणारे दुष्टचक्र बनून सध्या राहिले आहे.म्हसळा तालुका वनक्षेत्रात सुमारे ५२२१ हेक्टर क्षेत्रांत वनसंपत्ती आहे.फेब्रुवारी ते मार्च १० पर्यंत मालकी (खाजगी) क्षेत्रात एकुण १८ वणवे व फाॅरेस्ट क्षेत्रात ९ वणवे लागले आहेत.वन खात्याचे एकूण२५ हे.क्षेत्रांत वणवा लागला. खाजगी मालकी क्षेत्रांत नेवरुळ,म्हसळा,वरवटणे , घुम,पानवे,जांभूळ,कोळे, केल्टे,पानदरे,आंबेत मरयमखार , कुडतुडी,निगडी आशा गावांतून वणवे लागले आहेत.तसेच कोलवट,वरवटणे,घुम,पानवे,जांभूळ,तोराडी,पांगळोली, कुडगाव,मोरवणे इत्यादी गावातील सरकारीवन क्षेत्रात वणवे लागल्याच्या नोंदी आहेत.
” गाव- वाडींतील मूळ मालकानी बहुतांश जमीनी ह्या मुंबई- पुणे -नाशिक-जळगाव या भागातील लोकाना वारेमाप भावाने विकल्याने जमीन मालकाना रस राहीला नाही”