दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
:-काही व्यक्तीमत्वाच अशी दमदार असतात की ज्यांच्या सामाजिक कार्याने त्यांच्या व्यक्तिरेखेला भव्यता येते.
भुम परांडा वाशी येथील जनतेच्या समस्यांच्या अनास्थेच चक्रव्यूह भेदत सामाजिक प्रवाहात सकारात्मकतेने विकास कार्य गतिमान ठेवणारे कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉ.प्रा “तानाजीराव सावंत’…
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेती,माती आणि सामाजिक हिताची नाती जोडणारी आपुलकीची नाळ पुर्वीपासून कायम आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वाकाव या छोट्याशा गावापासून सुरू झालेला आयुष्याचा प्रवास आज संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्य हितासाठी सुरू आहे.
“गोरगरीब जनता व शेतकरी यांना दैवत मानत त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असा विचार कायम ठेऊन जनतेच्या गरजेसाठी, विकासासाठी,आरोग्यासाठी, कल्याणासाठी कायमचं तत्पर असलेलं लोकप्रिय मंञी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला सावंत सर्वश्रुत आहेत.
शेतकरी, कामगार व इतर कष्टकरी वर्गाच्या समस्या त्यांच्यामध्ये जाऊन समजावून घेणे व त्यावर त्वरित काम करणे हीच सच्च्या लोकसेवकाची ओळख आणि आपुलकीची प्रचिती वेळोवेळी जनसामान्यांनी अनुभवली आहे.”
शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचावी शिक्षणाची बीजं विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत सक्षम समाज निर्मितीसाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यासारख्या शहरात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) या नामवंत शैक्षणिक संस्थांचं जाळं उभारलं आहे.
मंञी तानाजी सावंत यांच्या रुपाने भुम परांडा वाशी मतदार संघातील नेतृत्व मिळालेलं ही पहिलेच मंञीपद विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.
बालाघाटच्या डोंगर रांगेतील भुम परांडा वाशी मतदार संघाच्या विकासाची सुञ हाती घेत विकास कामांना प्राधान्य देत त्यांच्या कामाचा ओघ सुरूच आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी हजारो बेरोजगार हातांना काम मिळावे यासाठी परांडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ खासगी साखर कारखाना उभारला.आणि त्यानंतर काही काळात भैरवनाथ साखर कारखान्याचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाच युनिट सुरू केले.
दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या भुम परांडा वाशी मतदार संघात पाण्याची टंचाई ओळखून शाश्वत पाणी निर्मितीचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी शिवजल क्रांतीचा शिवधनुष्य पेलत स्वखर्चातून मतदारसंघातील ५५० किमी नदी,नाले,ओढे ,यांचे खोलीकरण ,सरळीकरण ,रुंदीकरण करत चाळीस गावांना पाणीदार बनवले.यामुळेच शिवजल क्रांती ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजली व शिवजल क्रांतीचा परंडा पॕटर्न म्हणून नावलौकीकास आली या योजनेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती अशा नावाने ओळखली जाते.
आता नोकरीसाठी नको पुणे, मुंबई, धाराशिवमध्येच MIDC
धाराशिवचे जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी आता जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर लक्ष्य केंद्रित केलंय. नोकरीसाठी माझ्या गावच्या तरुणाला मुंबई, पुण्याला जाऊ लागू नये यासाठी जिल्ह्यातच MIDC मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यासंदर्भात पहिली बैठक घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत झाली. त्यात, धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी आणि शिराढोन येथे MIDC उभारण्याची घोषणा करण्यात आली. तर, फटाक्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तेरखेडा येथे फटका क्लस्टर सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्याच्या नावात बदल होताच, आता धाराशिवचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सावंत साहेबांनी हाती घेतलंय. त्यातलं, हे पहिलंच पाऊल उद्योगाच्या रूपाने पडलंय. नेहमीच मागास भाग म्हणून हेटाळणी केली जात असलेल्या आपल्या जिल्ह्याला आता प्रगतीचं वेड लागलंय. कारण सावंत साहेबांच्या रूपाने विकास पर्व सुरू झाले.
कष्टकरी, सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या सामाजिक दायित्व भावनेतून गेली चार वर्षांपासून भुम परांडा वाशी मतदार संघातील नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने मोफत साखर वाटप करण्यात येत आहे.
सामाजिक दायित्व भावनेतून समाजकारणाचा वसा हाती घेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातात त्याचा सर्व खर्च प्रा,तानाजी सावंत प्रतिष्ठान माध्यमातून होतो. तसेच विविध सामाजिक कार्ये केली जातात.
राजकारणा बरोबर समाजकारण,शैक्षणिक विकास ,वैज्ञानिक प्रगती ,सांस्कृतिक व्यासपीठ,शेतीप्रश्न ,उद्योजकीय सहभाग ,सहकारातून समृद्धीकडे हा मुलमंञ जोपासत ग्रामीण भागाचा कायापालट करत लोकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी एका सक्षमपणे सोयीसुविधा परिपुर्ण प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या गतिमान नेतृत्वास वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून सदिच्छा.
शब्दांकन
लक्ष्मण जाधव
(पञकार, निवेदक, व्याख्याते, मुलाखतकार)