दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर-
आज देगलूर येथे भारत राष्ट्र समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीनंतर शेतकरी नेते, माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले कि भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मागील आठ नऊ वर्षात तेलंगणा राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दलित व महिलांचा सर्वांगीण विकास केला. शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, सिंचनाच्या सुविधा, मशागतीसाठी एकरी 10 हजार रूपये अशा प्रकारच्या योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट केला. तेलंगणा राज्य म्हणून भारतातील एक आश्चर्यच आहे. म्हणून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी सर्वागीण विकासासाठी भारत राष्ट्र समितीत सामील व्हावे.
26 मार्च रोजी लोहा येथे होणाऱ्या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर, यशवंत कुर्हाडे, निवृत्त सनदी अधिकारी व्ही. जे. वरवंटकर, तेलंगणातील मार्केट कमिटी संचालक विजय पाटील सोनाळकर, अँड. अशोक जाधव, गणेश पाटील हांडे, सुनिताताई बेळीकर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बलभीम पाटील मरतोळीकर, पिराजी राजूरे, विठ्ठलरेड्डी पुल्लागोर, रमेशराव घुळेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम वद्देवार, शेख अहमद शहापूरकर व शेतकरी व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.