दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नाशिक : गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आयोजित सभेतील भाषणादरम्यान ते बोलत होते.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “पंधरा दिवसांपूर्वी खेडला सभा घेतली होती.
कालची सभा ही आणखी अथांग पसरलेली आहे.
आपलं नाव चोरलेलं आहे, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काहीही नाही, तरीही इतकी मोठी गर्दी माझ्यासमोर उभी आहे. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे.
मी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही. मी तुमच्या प्रश्नांसाठी लढायला उभा आहे.
आता जिंकेपर्यंत लढायचं, असं एकच ब्रिदवाक्य आमचं आहे.
गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही.
कोरोना काळात धारावी आणि मालेगावात परिस्थिती गंभीर होती. त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना मालेगावातील धर्मगुरूंशी बोललो. त्यावेळी तुम्ही सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो.
मुख्यमंत्रिपद येतं आणि जातं. पण तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक मानलात. असं प्रेम गद्दारांच्या नशिबात नाही. तुम्ही हे प्रेम चोरू शकणार नाही.
शेतकऱ्यांसाठी योजना आखल्या पण सरकार पाडलं
मी येथे दोन शेतकऱ्यांची आवर्जून भेट घेतली. एक म्हणजे रतन काका भागवत आणि दुसरे कृष्णा डोंगरे. त्यामध्ये रतन भागवत हे एक प्रतिकात्मक उदाहरण आहे. रतन काकांनी दागिने
तुम्ही शेतकरी, तुमच्या हाती नांगराशिवाय काहीही नसतं.
अडीच वर्षे आपलं सरकार असताना आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं होतं. महात्मा फुले कर्जमुक्तीच्या योजनेचा फायदा मोठ्या बागायतदारांना मिळाला नव्हता. पण दोन लाखांपर्यंतचं पीक कर्ज असलेल्यांना त्याचा लाभ मिळाला होता.
आपण एक-एक करून गोष्टी पूर्ण करत होतो. ते आमचं पहिलं पाऊल होतं. त्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर आपण देणार होतो.
पाच वर्षांपर्यंत आपण सर्व शेतकऱ्यांचा विचार केलेला होता. पण शेतकऱ्यांसाठी आपण योजना आखल्या आणि गद्दारी झाली.
मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकरी पुत्र आहात. केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवा. पण शेळीच्या तोंडून काय आवाज निघणार, अशी टीका ठाकरेंनी केली.
खेडच्या सभेवेळी अवकाळी पाऊस झाला होता. सगळ्यांना वाटलं की मुख्यमंत्री, कृषीमंत्री पाहणी करतील. पण त्यांनी कुणालाही विचारलं नाही. चांगलं काम करणारं सरकार तुम्ही पाडलं आहे.