दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तिन चार वेळा भेटले असून त्यापुढील हप्ते त्यांच्या खात्यात जमा होणे बंद झाले असून काही शेतकऱ्यांचे गाव एक व शेती दुसऱ्यागावी असणाऱ्या त्याही शेतकऱ्यांचा हप्ता बंद झाला असून ते अनुदान बंद होण्याचे कारण तपासून तात्काळ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी बालाजी सदाशिव पाटील वडजे मसलगेकर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष कंधार यांनी कंधार तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान हप्ता जमा करण्याची मागणी केली आहे.