दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार
समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली,असून शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यात हालचालींना चांगलाच वेग आलाआहे.या ठिकाणा वरून दिसुन येत आहे.बाजार समितीत आता महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट व भाजपा आमने-सामने येणार की,स्थानिक पातळीवर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या चुली मांडणार हे येणाऱ्या काळातच ठरणार आहे.कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवल्या जातील,अशा पद्धतीने नियोजन यावेळी करण्यात येत आहे.गेल्या वर्षभरापासून प्रतीक्षेतअसलेले हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुक प्रक्रिया दिनांक २७मार्च रोजी पासून सुरु होणार आहे. तर २९एप्रिल मतदान घेऊन३०एप्रिल मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.निवडणुकीची प्रक्रिया या पद्धतीने राहणार आहे.नामनिर्देशन पत्र दाखल करणे साठी दिनांक २७मार्च पासून सुरु होणार असुन,शेवटी नामनिर्देशन पत्र भरण्याची दिनांक०३एप्रिलआहे.नामनिद्देशन पत्राच्या यादीची प्रसिद्धी दिं.०३एप्रिल तर छाननी दिनांक०५ एप्रिल व वैद्य नामनिर्देश पत्राच्या यादीची प्रसिद्धी दिनांक०६ एप्रिल पर्यंत तरअर्ज मागे घेण्याचे दिनांक २०एप्रिल तर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या अंतिम यादी व चिन्ह वाटप दिनांक-२१ एप्रिल रोजी होईलआणि दिनांक २९ एप्रिल रोजी मतदान तर दिनांक३० एप्रिल रोजी मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निवडणूक कार्यक्रम परिपत्रकात सांगितले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाजाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यात आत्तापासूनच उत्साह संचारला असून माझ्याच राजकीय नेत्याची व पक्षाची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर येणार आहे.अशी चर्चा जोरदार सुरू असून,येणाऱ्या काळात काँग्रेस विरोधात शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तरीत्या लढतील की वेगवेगळ्या लढतील तर तिसरा पर्याय म्हणून भाजप-शिंदे गट सुध्दा येणाऱ्या काळातच निवडणुक लढवणार आहे.ज्याचे त्याने पक्ष स्वतंत्र लढल्या जाईल,असेही विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यातून सांगितले जात आहे.आणखी भर म्हणजे यातच प्रथमच तेलंगणा राज्यातील भारतीय राष्ट्र समिती पक्षाने निवडणुकीत आपले उमेदवार उतरून निवडणूकीत उतरण्याची दाट शक्यता आहे.तसे झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मात्र रंगतदार होईल व खिचडीचे उमेदवार निवडून येतील काय?अशीही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेअशी सुद्धा सुताराम शक्यताआहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सामील होणार की नाही?हे आगामी काळात कळेल तर शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनीआतापासूनच जोरदार तयारी केल्याचे दिसून येते.तर यावेळेस तेलंगणा राज्यातील भारतीय राष्ट्र समिती पक्ष सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरून येथील राजकीय प्रस्थापित पक्षाच्यां कार्यकर्त्यांना धोबी पछाड देण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करून निवडणुकीत उतरणार असल्याचे कळते आहे.तसे झाल्यास बाजार समितीचे निवडणूक अतिशय मजेदार व रंगतदार होईल,अशीही शक्यता वर्तवली जात आहे.सध्या तर या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्ता जोरदार तयारी केली जात आहे.पण येणाऱ्या काळातच कोण कोण कार्यकर्ते कुणा कुणा गटात जातील,यावर बरेच काही विसंबून असणार आहे.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे गट, भाजप-शिवसेना शिंदे गट,वंचित बहुजनआघाडी,बसपा व इतर राजकीय पक्ष सुद्धा आपली उमेदवार उभे करुन निवडणूक लढवत असल्याची कळतेआहे.