दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
परतुर प्रकाश सोळंके यांनी मा.मुख्यमंत्र्यांना मा.जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि,२८ मार्च २४ मार्च २०२३ रोजी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली निवेदनात पुढे म्हणाले एक वर्ष होऊन गेले, सई कंट्रक्शन एजन्सीची मुदत संपली, संपल्यावर एजन्सीला अर्ज देखील केलेला नाही, रस्त्याचे काम चालू आहे, म्हणून काम बंद करून दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कारण,राष्ट्रीय महामार्ग ५४८ ते येणोरा.माव.पाटोदा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी मे साई कंट्रक्शन जालना यांनी दिले होते २४ मार्च २०२३ रोजी मुदत संपली, या रा.मा. क्रमांक २२३. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत काही दिवसांपूर्वी केलेले दीड किलो मीटर काम या ५ किलोमीटर कामांमध्ये समाविष्ट केले, या रस्त्याच्या बोगस कामाची पाहणी मा.जिल्हाधिकारी साहेब जालना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी संयुक्त पाहणी करावी म्हणून दि.२४/३/२०२३ रोजी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली होती परंतु संबंधित सई कंट्रक्शनचे मालक सागर बरदापूरकर यांनी परवानगी न घेता काम चालू केले आहे, कारण बोगस काम असल्यामुळे काम २६/३/२०२३ रोजी घाई गडबड करून २ कोटी.४४ लाख.४० हजार रुपये खर्च करण्याच्या नावाखाली चुना लावायचा प्रयत्न प्रधानमंत्री सडक योजनाचे कार्यकारी अभियंता उपअभियंता अधिकारी व सई कंट्रक्शन यांनी खडीचे खाल्ले काम बोगस केल्यामुळे वरती माती मिश्रित लेअर टाकत आहेत या कामाची संयुक्त पाहणी करून, परवानगी घेतली नाही म्हणून काम बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे,