दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा पूर्वीच्या काळात गावखेड्यातील लग्न सोहळ्याचा आनंद काही वेगळाच होता .महिन्या आधी लग्नाची तयारी चालायची जांभळीचा मांडव असायचा दळण वळणाची व्यवस्था नसल्याने वराकडील वऱ्हाड मंडळी बैलगाडीचा प्रवास होता परंतु आता गेले ते दिवस व राहिल्या त्या आठवणी अशा आधुनिक काळात नविन पध्दतीने नवीन लग्न सोहळे होतांना दिसत आहेत.
कुटुंबप्रमुख आर्थिक परिस्थितीनुसार वर किंवा वधूचा विवाह करीत असतो. पूर्वीच्या काळात शेतकरी आपल्या दारातच मांडव घालुन सोहळा करीत होता. काळ बदलला तशी मांडवांची जागा शहर, गावातील मंगल कार्यालयांनी घेतली आहे. त्यामुळे पूर्वी मांडवात होणारे विवाह सोहळे अलीकडच्या काळात मंगल कार्यालयात होत आहेत. एकत्रित कुटुंब पद्धती, गावकी – भावकी मध्ये आपुलकी, वेळेचे गणित आदी कारणांमुळे मांडवातील सोहळ्यांना ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्याची प्रथा रुजू लागली आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न होत होती. त्या काळात मंगल कार्यालये ओस पडली होती. परंतु सध्या मंगल कार्यालये गजबजली आहेत. धूमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा, स्वप्न आता प्रत्येक वधू- वरासह त्यांच्या आई-वडिलांचे साकार होत आहे. मोठा खर्च करून मुलाचे किंवा मुलीचे लग्न हॉलमध्ये धूमधडाक्यात होईल, याकडे वधू- वर पक्ष बघत आहे. परंतु, यामध्ये ग्रामीण भागातील जुन्या चालीरीती लोप पावत चालल्या आहेत.
गावात लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळी ही त्यांच्या गावातील नातेवाइकांच्या गाठीभेटी गाठीभेटी घेत खुशाली विचारत असत. पूर्वी शक्यतो लग्न मुलीच्याच दारात अथवा गावातील मंदिराजवळ होत असे.
नवरदेवाचे वऱ्हाड आले की त्यांचा मानपान राखला जात होता. सरबत, हळदीचे जेवण व लग्न झाले की, पटांगणात दिवसभर पंगत असायची. वेळेवर, मुहूर्तावर विवाह होत होते. सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध होत असे. सर्वांची दक्षता घेतली जात असे. गावकी भावकीचा दबदबा असायचा. आपल्या गावाचे नाव जपता आले पाहिजे. म्हणून जो-तो झटत होता.त्यामुळे पंचक्रोशीतील लोक गावात झालेल्या लग्नाचे नाव काढत असत. दोन्हींकडील वर-वधू पक्षांबरोबरच गावाचेही कौतुक करीत होते. गेल्या २० वर्षांत ग्रामीण आणि शहरीकरणाचा तोंडवळा बदलून गेला आहे. यादी पे शादी’ चा कुटुंबीयांनी अनेक अनुभवला आहे ग्रामीण जुन्या चालीरीती हळूहळ लोप पावत चालल्या आहेत. दारात, गावात, मांडवात होणारे सोहळे शहरातील हॉलमध्ये होऊ लागले आहेत. त्यामुळे खेड्यातील विवाह सोहळ्यांना आता लगाम लागला आहे.