दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- कंधार तालुक्यात असलेल्या गायरान जमीनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाची परवानगी न घेता सदरील गायरान जमीनी अतिक्रमण करून जमीनी हस्तगत केल्या असून त्याची कसून चौकशी करून त्या जमीनी सरकारने ताब्यात घ्यावी व सदरील गायरान जमीनीवर भविष्यात अतिक्रमण न होण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी. तरी आजपर्यंत आपल्याकडे पत्रव्यवहार करूनही त्याचा कुठलाच विचार केला नाही. संबंधित अधिकारी केलेले पत्रव्यवहार कचरा कुंडीत टाकून देतात तरी आपण तहसीलदार या नात्याने वरील बाब लक्षात घेऊन अशा प्रकारे वर्तन करणारे अधिकारी व अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करून त्या सर्व जमीनी शासनाने तात्काळ ताब्यात घ्याव्यात अशी मागणी कंधार तहसीलदार यांना निवेदन देऊन व्यंकटी जाधव, पांडुरंग कंधारे, गजानन जाधव यांनी मागणी केली आहे.